माळकरंजा – कळंब तालुक्यातील माळकरंजा येथे जयभीम प्रतिष्ठानच्या वतीने २७ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य मिरवणूक व भीम गीतांच्या मधुर सुरांनी भारलेले वातावरण. जयभीम प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्रीकांत जाधव,सुदर्शन जाधव, नरसिंग (बुबा) लोमटे,सुरज सरवदे,राहुल सरवदे,माणिक तूपारे या कार्यकर्त्यांनी जयंती आयोजनात अतिशय मोलाचे योगदान दिले. तसेच हरीभाऊ जाधव,मोहन जाधव व मधुकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अनुकरणीय ठरला. मिरवणुकीदरम्यान डॉ.आंबेडकर यांचे विचार जागवणारी फलकं, ध्वज आणि भीम गीतांचा DJ मधून होणारा उत्स्फूर्त आवाज यामुळे संपूर्ण परिसर प्रेरणादायी झाला होता.नागरिकांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गावचे आदर्श पोलिस पाटील विशाल टिंगरे यांनी जयभीम प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ,सहभागी नागरिक व पोलिस प्रशासनाचे विशेष आभार मानले.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा