बदलापूर ( गुरुनाथ तिरपणकर) – शाळेत एकत्र बसून मधल्या सुट्टीतील खाल्लेला डबा,अभ्यास न करता काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडुन मिळालेली शिक्षा,यामुळे परिस्थितीशी जुळवून कोणतीही शिकवणी न लावता मिळालेले यश हे त्यावेळचे वास्तववादी चित्र होत.आपल्या जीवनात मित्रत्व हे कौटुंबिक नात्या पेक्षा ही श्रेष्ठ असत.शालेय जीवनातील जुन्या आठवणी जाग्या होतात म्हणूनच ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय,वायंगणी,ता.मालवण येथील १९७८ च्या एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांनी बदलापूर येथील डी.वाय.पाटील रिसाॅर्टवर स्नेहसंमेलन आयोजित केले होते.आजच्या या गेट टु गेदरच्या निमित्ताने त्यांची एकता व मित्रता पुन्हा ताजीतवानी झाली.जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.त्यामुळे स्नेहाची भावना अधिकच दृढ झाली.असे क्षण पुन्हा पुन्हा निर्माण करुया आणि एकत्र येऊन आनंद साजरा करुया अशी भावना सर्वांनींच व्यक्त केली.यावेळी प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या आणि कलात्मक विचारांचे रंग भरता आले याबाबत समाधान व्यक्त केले.या स्नेहसंमेलनात गुरुनाथ धुळे,किशोर पेडणेकर,रमा पेडणेकर,सुधीर माळगावकर,दिलीप भोसले,संध्या मुळे,कल्पना वायगंणकर,उत्तम सुर्वे,विजय नाईक,बाळा टिकम,उदय रेवनकर,गोपाळ गोसावी इत्यादी उपस्थित होते.शालेय जीवनातील आठवणींची ही शिदोरी पुढच्या प्रवासाला नवी उर्जा देणारी आहे,असे सुर आळवत पुन्हा पुन्हा भेटण्याच्या आणाभाका घेत सर्व मित्र-मैत्रिणींनी जड अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेतला.
More Stories
लातूरात भगवान बुद्ध जयंती उत्साहात साजरी