कळंब – नवोदय – शिष्यवृत्ती परिक्षेच्या दृष्टीने शालेय पातळीवर उपयुक्त ठरणाऱ्या माझा महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत कळंब तालुक्यातील खडकी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा इ.5 वी वर्गातील विद्यार्थी रणवीर राजेंद्र पवार याने 200 पैकी 196 गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला. रणवीर याने यापूर्वी मंथन,एन.एस.एस.ई., आय.एम.विनर, अक्षरगंगा,ज्यु.आय. ए.एस.,अशा अनेक परिक्षेत यश मिळवले असून त्याची 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेतून नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड पण झाली आहे. रणवीरला खडकी शाळेतील त्याचे वर्गशिक्षक तथा मुख्याध्यापक आनंद राणे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील शिक्षक तात्यासाहेब सुरवसे व सुरेश जोशी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारूती विटेकर,उपाध्यक्ष सौ.कल्पना राखुंडे व सरपंच सौ. अस्मिता राखुंडे तसेच उपसरपंच सुखदेव राखुंडे यांनी त्याचे अभिनंदन केले.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा