कळंब (अरविंद शिंदे ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे सांस्कृतिक विभाग आणि रासेयोच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.संजय कांबळे,संचालक,ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा हे उपस्थित होते. या निमित्ताने आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी म्हणाले की,भारताचे शिल्पकार,पहिले कायदेमंत्री,युगप्रवर्तक,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ,शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांचे कैवारी,अठरापगड जातींतील शोषित स्त्री,बहुजन समाजाचे उद्धारक आणि मानवतावादी, प्रज्ञासूर्य,विश्वरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम समजून कार्य केले.त्यातूनच वंचित परिघाबाहेर असलेल्या समाजातील माणसाला प्रवाहात आणून त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी दिली,असे प्रतिपादन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी केले. यानिमित्ताने प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांच्या प्रकाशित सावित्रीबाई फुले गौरव ग्रंथ,गौरी प्रकाशन,वर्धा आणि आदर्श मराठी व्याकरण ,संस्कृती प्रकाशन,पुणे हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. पुढे ते म्हणाले,”आजच्या पिढीकडे अनेक सामाजिक माध्यमे आणि शैक्षणिक साधने आहेत.विज्ञान तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा शिक्षण घेतले आणि आदर्श निर्माण केला.याचा परिस्थितीचा नक्कीच सकारात्मक विचार करून आपण वाटचाल केली पाहिजे. समताधिष्ठित राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले.स्वातंत्र्य,समता,विश्वबंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जोपासना करण्यासाठी जगातील सर्वात मोठी आदर्श लोकशाहीची राज्यघटना लिहून अद्वितीय कार्य केले. या जयंतीनिमित्त उपप्राचार्य प्रा.अप्पासाहेब मिटकरी,रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.आर.व्ही.ताटीपामुल,प्रा.डॉ.संदीप महाजन,प्रा.डॉ.श्रीकांत भोसले,प्रा.डॉ.ईश्वर राठोड,प्रा. अभिजित बोबडे,प्रा.कळसे,प्रा.शिंदे हे उपस्थित होते.यासोबतच अधीक्षक हनुमंत जाधव,संतोष मोरे,विनोद खरात,अरुण मुंडे, कालिदास सावंत,जयसिंग तांबे, साजिद शेख उपस्थित होते. कमलाकर बंडगर,अर्जुन वाघमारे आणि संदीप सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे