कळंब (शिवराज पौळ) – दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात शासनाने नियुक्त केलेले मुद्रांक विक्रेते तात्पुरत्या शेडखाली मुद्रांक विक्री करत होते.ही सुविधा विशेषतःग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठ्या उपयोगाची ठरत होती. कार्यालयीन कामकाजासाठी दूरवरून येणाऱ्या नागरिकांना,शालेय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येथेच आवश्यक मुद्रांक सहज उपलब्ध होत असल्याने त्यांचा वेळ आणि श्रम वाचत होते. मात्र,काही तक्रारींमुळे प्रशासनाने हे तात्पुरते शेड काढून टाकले आहेत.त्यामुळे नागरिकांना आता इतरत्र जावे लागत असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना मुद्रांक खरेदीसाठी इतरत्र फिरावे लागत असल्याने वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भार वाढला आहे. नागरिकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी व मुद्रांक विक्रीसाठी निश्चित आणि सोयीस्कर जागा उपलब्ध करून दिल्यास,ही समस्या सुटू शकते. शासनाने या बाबतीत त्वरित निर्णय घेऊन नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक शिवश्री अतुल गायकवाड,जिल्हाध्यक्ष अँड. तानाजी चौधरी,तालुका अध्यक्ष दत्तात्रय कवडे,आकाश मुंडे, जावेद सौदागर,शरद कावळे, आदित्य देशमुख व मनोज लोमटे पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे