कळंब – धाराशिव ते छत्रपती संभाजी नगर व्हाया बीड रेल्वे मार्गावर कळंब रेल्वे स्थानक करणे आणि कळंब रोड ( तडवळे कसबे) येथे सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्या बाबत कळंब रेल्वे कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक राज्याचे प्रादेशिक रेल्वे सल्लागार डॉ आदीत्य पतकराव ( पुणे ) अंबाजोगाई दौऱ्यावर आले असताना त्यांना अंबाजोगाई येथे भेटून निवेदन देण्यात आले. व यावेळी डॉ.रामकृष्ण लोंढे व डॉ.अमीत पाटील यांनी सदरील रेल्वे मार्ग कळंब करांच्या सोईच्या दृष्टीने आखण्यात यावा. तसेच कळंब रोड येथे लातूर- मुंबई सह ईतर सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.डॉ.पतकराव यांनी दोन्ही ही गोष्टी व्यवस्थित ऐकून घेतल्या व त्यावर सकारात्मक अहवाल देण्याचे आश्वासन दिले रेल्वेच्या प्रश्नावर कळंब तालुक्यातील नागरिक सक्रिय झाले असून रेल्वे मंत्रालयाने छत्रपती संभाजीनगर व्हाया बीड या रेल्वेमार्गा सर्वेसाठी अर्थसंकल्पात सहा कोटी तरतूद केली आहे.रेल्वे मार्ग कळंब शहरातील नागरिकांच्या सोई नुसार आखण्यात यावा या मार्गावर कळंब रेल्वे स्टेशन निर्माण करावे यासाठी कळंब येथील नागरिकांनी बैठक घेऊन कृती समिती स्थापन करून या प्रश्नी वेळोवेळी पाठपुरावा करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे या अनुषंगाने कळंब रेल्वे कृती समिती सदस्यांनी प्रादेशिक रेल्वे सल्लागार डॉ.आदित्य पतकराव यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यांनी याविषयी सकारात्मक अहवाल देण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे या कामासाठी आणखीन उत्साह वाढला आहे.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा