June 22, 2025

शाश्वत जल व्यवस्थापनामुळे भारत गुणवत्तापूर्ण धान्य उत्पादनात स्वंयपुर्ण होईल- प्रा.डाॅ.रमेश पांडव

  • धाराशिव- ठिबक सिंचना सारखी आधुनिक सिंचन पद्धती वापरुन पाण्याचा कार्यक्षम उपयोग शेतीसाठी करुन पिक उत्पादनात वाढ घडवुन आणली पाहिजे. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे.
    रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा अतिवापरामुळे जमीनी नापिक बनत आहेत. अन्न विषयुक्त बनत आहे.सकस व पौष्टिक अन्न आरोग्यता मानसिक व शारीरिक जपण्यासाठी आवश्यक आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करणे म्हणजे संभाव्य रोग होणार नाहीत.कोणतीही आपत्ती येणार नाही.
    नदीजोड प्रकल्प राबविणे काळाची गरज आहे.इस्राइल मधील जलसिंचन सुविधा याविषयी त्यांनी सखोल विश्लेषण केले.कमी पावसाचा प्रदेश अजुनही,इस्राइल इच्छा शक्तीच्या बळावर,समुद्रातील पाण्याचे डिसॅलिनेशन करुन, गोड़या पाण्याची उपलब्धता वाढविण्यात आली आहे. मराठवाडयाच्या हक्काचे कृष्णा खोरयातील पाणी मिळाले पाहिजे.कोकणातील अतिरिक्त पाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातुन मराठवाडयात वळविले पाहिजे.कृषी क्षेत्रात रोजगार बाबत असंख्य संधी निर्माण होऊ शकतात.जल, जंगल,जमीन,जनसंख्या वाचविली पाहिजे.वने नष्ट होत असल्यामुळे रोग वाढत आहेत. कारण वनातील वटवाघळे, जीव-जंतु मानवी वस्तीकडे वळत आहेत. निसर्ग,पर्यावरण सुरक्षित राखले,तर मानवी जीवन निश्चितच,सुखी,संपन्न होईल. आर्थिक व सामाजिक विषमता नष्ट झाली पाहिजे.संसाधनावर समान मालकी हक्क असले पाहिजेत.शाश्वत जल व्यवस्थापनाच्या माध्यमातुन भारत गुणवत्तापूर्ण धान्य उत्पादनात स्वंयपुर्ण होईल असे मत प्रा.डाॅ.रमेश पांडव यांनी उउद्घाटनपर भाषणात व्यक्त केले. ” अन्न सुरक्षेसाठी जल व्यवस्थापन ” या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव येथील जल व भूमी व्यवस्थापन विभागाच्या वतीने परिषद आयोजित करण्यात आली.
    दुसरे तांत्रिक सत्रात, डाॅ. तांबडे यांनी ‘वाॅटर स्मार्ट शेती’ विषयावर मार्गदर्शन केले.पाणी व्यवस्थापनात हुशारीने आणि कार्यक्षमतेने बदल घडवुण आणता येतो.शेतीमध्ये पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे.स्मार्ट पाणी व्यवस्थापनात पाण्याची बचत होते.पिकांची उत्पादकता वाढते. सेंसर तंत्र ज्ञानाचा वापर केला पाहिजे. स्वंय चलित तंत्रज्ञानावर, सेन्सर आधारित सिंचन पद्धती माध्यमातुन पाण्याची बचत होते,पाण्याचा कार्यक्षम उपयोग होतो, उत्पादनात वाढ घडवुन येते.जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख व राष्ट्रीय परिषदेचे निमंत्रक डाॅ. नितीन पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.अधिसभा सदस्य देविदास पाठक यांनी पाणी व्यवस्थापनाचे महत्व स्पष्ट केले.माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजन सचिव अभिजित पडवळ यांनी आभार मानले. प्राध्यापक,संशोधक,कर्मचारी, विद्यार्थी,बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
error: Content is protected !!