June 20, 2025

शाश्वत विकासासाठी शेतकऱ्याने शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – आमदार कैलास पाटील

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यातून देखील आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे प्रयोग राबविले जात असून अशा कृषी प्रदर्शनातून निश्चितपणे शेतकरी अद्यावत व आधुनिक होण्यासाठी मदत होईल या पुढील काळातही असे कृषी प्रदर्शन आयोजित केली जावेत असे मत धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी व्यक्त केले. फ्रेंड्स फोरेवर फाउंडेशन आयोजित किसान मित्र कृषी प्रदर्शन 2025 च्या उद्घाटन प्रसंगी ते स्वागत अध्यक्ष म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फ्रेंड्स फोरेवर फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल कवडे हे होते तर नॅचरल शुगरचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड,इनरव्हीलच्या अध्यक्षा प्रतिभाताई भवर,तालुका कृषी अधिकारी सरडे,पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज चव्हाण,विश्वजीत जाधव, आलोक मिश्रा आदींची उपस्थिती होती.
  • पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की,सातत्याने प्रयोगशील शेती म्हटल्यानंतर बारामतीच्या आवर्जून उल्लेख केला जातो मात्र बारामती देखील आपल्यासारखं दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. बारामती मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तेथील शेतीचा कायापालट झाला.अगदी त्या पद्धतीने आपण आपल्या भागाची मागास म्हणून असणारी ओळख पुसून टाकली पाहिजे. यासाठी अशा पद्धतीचे कृषी प्रदर्शन आयोजित करणे त्यामध्ये सातत्य ठेवणे काळाची गरज आहे.आपल्या भागातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती क्षेत्रामध्ये नवनवीन बदल घडत आहेत.शेतकऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी.शेतकऱ्यांनी सरकारच्या तात्पुरत्या अनुदानाचा विचार न करता कायमस्वरूपी शेतीच्या विकासासाठी कायमचे पाणी कसे मिळेल यासाठी आता लढा उभा करणे काळाची गरज आहे . यासाठी शेतकऱ्यांनी व फ्रेंड्स फोरेवर फाउंडेशनने पुढाकार घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी कृषी भूषण पांडुरंग आव्हाड म्हणाले की,यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेती व तरकारीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये वृद्धी होते यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी अंगीकार करावा.आर्थिक समृद्धीसाठी शेतकऱ्यांनी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय ,पोल्ट्री फार्म,रेशीम शेती असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत.शेतकऱ्यांनी मार्केटिंग करून कॉर्पोरेट व्हावे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी तीर्थकर व प्रा.जगदीश गवळी यांनी प्रस्ताविक भारत पारवे यांनी तर आभार अमोल उबाळे यांनी मानले.

  • या कृषी प्रदर्शनाची सुरुवात सकाळी शहरभर शोभायात्रा काढून करण्यात आली.बैलगाडी शेतकऱ्यांच्या आयुष्यातील विद्यार्थी पारंपारिक वाद्य याचा समावेश होता.स्टॉल पाण्यासाठी शेतकरी व ग्राहकांची दुपारी गर्दी होती.अश्वप्रदर्शनासाठी 50 हून अधिक घोडे सहभागी झाले होते. विजेत्याना सन्मानपत्र बहाल करण्यात आले.
    या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी फ्रेंड्स फोरेवर या वर्ग मित्रानी अथक परिश्रम घेतले.
error: Content is protected !!