धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात गावातील विविध ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.तसेच सकाळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.दुपारच्या सत्रामध्ये बालविवाह प्रतिबंध या विषयावर प्रा.डॉ.जी.डी.कोकणे,इंग्रजी विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर धाराशिव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.आपल्या मार्गदर्शनात डॉ. गोविंद कोकणे यांनी जनजागृती, उच्च शिक्षण आणि कायदयाची अंमलबजावणी या माध्यमातुन बालविवाह हि अनिष्ट प्रथा, परंपरा पुर्णपणे बंद करता येईल, असे प्रतिपादन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण व सामाजिक विकास शाश्वत विकासाचे महत्त्वाचे घटक आहेत.जगात बालविवाह आयोजित करण्यात भारताचा तिसरा नंबर आहे.बालविवाह आयोजित करण्यात महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.बालविवाह होणे सामाजिक मागासलेपणाचे लक्षण आहे. पालकांचे समुदशेन करुन बालविवाह थांबविले पाहिजेत. मुलामुलींना उच्च शिक्षण दिले पाहिजे.उच्च शिक्षणातून आत्मविश्वास,आत्मप्रतिष्ठा वाढते.बालविवाहामुळे बालकांचे नैसर्गिक हक्क हिरावून घेतले जातात.सुजाण,जबाबदार नागरिक बनण्या अगोदर संसाराची जबाबदारी दिल्यामुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. उच्च शिक्षणाच्या अभावाने त्यांना आशा,आकांक्षा पुर्ण करण्यात अडथळे येतात.सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक,नैतिक, राजकीय विकासासाठी उच्च शिक्षणाची भूमिका निर्णायक आहे.गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावते.उच्च शिक्षणातून व्यक्तीमत्व विकास, समस्या सोडविण्याचे कौशल्य, विचार करण्याची क्षमता, विवेकबुद्धी,तर्कशुद्ध विचार, सामाजिकता,भावनिक विकास इ. गुण,कौशल्य विकसित होतात.उच्च शिक्षणातून सजग, सुजाण नागरिक तयार होतात. प्रत्येक व्यक्तीला गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण घेतल्यानंतर वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात यश मिळविण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. बालविवाह प्रथा नष्ट करण्यासाठी प्रत्येक सजग व्यक्तीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.उच्च शिक्षणातून राष्ट्रीय विकास होतो.सर्वांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे.सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डाॅ. राहुल खोब्रागडे व्यासपीठावर उपस्थिती होते.त्यांनी आंतरविद्याशाखीय व बहुविदयाशाखीय शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले.सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केले.वैभव भोरे यांनी आभार मानले. सायंकाळच्या सत्राला गावातील महिलालांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.सदरील कार्यक्रमाचे नियोजन हे शिबिरार्थी विद्यार्थिनी तसेच नीता मारकल,पूर्णिमा गुंड,कविता चव्हाण,निकिता माळी व मेघा काळे यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला