कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – धाराशिव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांचे पारडे आता अधिक मजबूत झाले आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे अजित पिंगळे यांना शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या विजयाच्या संधी अधिक वाढल्या आहेत. या निवडणुकीत महत्त्वपूर्ण घटनांपैकी एक म्हणजे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले सूरज साळुंके, सुधीर पाटील आणि शिवाजी कापसे यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या तिघांनीही महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांना उघड पाठिंबा जाहीर केला आहे.यामुळे आता महायुतीच्या उमेदवारासाठी स्पर्धा आणखी कमी झाली आहे. महायुतीत शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पक्ष (भाजप), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या सर्व प्रमुख घटक पक्षांचा समावेश आहे. या सर्व पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन अजित पिंगळे यांना विजयी करण्यासाठी परिश्रम करत आहेत. धाराशिव मतदारसंघात महायुतीच्या एकतेमुळे पिंगळे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. या सगळ्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर धाराशिव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढली आहे. मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून, मतदार आता कोणत्या बाजूला झुकतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या एकत्रित ताकदीमुळे अजित पिंगळे यांचे स्थान अधिक भक्कम झाले आहे,असे मानले जात आहे.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे