लातूर – हिंदी भाषा जागतिक स्तरावरची भाषा बनलेली आहे. जागतिकीकरणाच्या युगामध्ये हिंदी भाषेला अत्याधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. एवढेच नव्हे तर तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये हिंदी भाषा फार उन्नती केलेली आहे. हिंदी भाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध होत आहेत.यामध्ये फिल्म क्षेत्रापासून ते औद्योगिक क्षेत्रापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून ते भाषांतरापर्यंत अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये हिंदी भाषेचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये होत आहे. एवढेच नव्हे तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वैद्यकीय शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाचे शिक्षण सुद्धा हिंदी भाषेत दिले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात हिंदी भाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ते येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात हिंदी दिवस समारंभात प्रमुख पाहुणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. वैशाली जयशेटे, प्रा. शैलेश कानडे, कला विभागाचे समन्वयक प्रा. रवींद्र सोनवणे, प्रा. विश्वनाथ स्वामी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमा पूजनाने झाली. पुढे डॉ. भुरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या दृष्टिकोनातून हिंदी भाषेकडे पहावे. या भाषेच्या माध्यमातून पत्रकारिता, फिल्म, भाषांतर, पटकथा लेखन, गीत, आकाशवाणी आणि दूरदर्शन अशा विविध क्षेत्राकडे डोळसपणाने पहावे. अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, हिंदी मधुर भाषा आहे. ही भाषा जगभर प्रसिद्ध आहे. हिंदी भाषेत भारतच नसून जगभरामध्ये संवाद करणे सोपे झालेले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा हिंदी भाषेकडे शासन विशेष लक्ष देत आहे. हिंदी भाषा भारताची भाषा आहे अशी ओळख जगामध्ये आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा आणि वर्गामध्ये शिक्षकांच्या अध्यापनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आजचे हे विद्यार्थी भारताचे भावी नागरिक आहेत. त्यांनी आपली संस्कृती, भाषा आणि मूल्यांचे संगोपन करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. घनश्याम ताडेवार यांनी केले. हिंदी पखवाडा उपक्रमाच्या अंतर्गत महाविद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आले होते या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आले होते. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले.यात वक्तृत्व स्पर्धेत 1.भावना राळवन 2. अमृता डांगे 3. उमा पवार 4. हुलगुंडे अंबिका कविता वाचन स्पर्धा 1. लोया निलाक्षी 2. मठपती कामिनी 3. धनुरे मेघा निबंध लेखन स्पर्धा 1.जाधव भक्ती बालाजी2.मुकडे सानिका धनंजय 3.पठाण शफी अताऊल्ला यावेळी कला व वाणिज्य शाखेतील प्रा. दीपक बजाज, प्रा. नागेश सुगरे, प्रा. शिवशंकर कामाजी, प्रा. मनोज वैरागकर, प्रा. रवींद्र सुरवसे, प्रा.एम.पी. नीला, प्रा. रूपाली हलवाई, प्रा. शुभांगी खुब्बा, प्रा. विष्णू तातपुरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. कल्पना गिराम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष येंचेवाड, राजाभाऊ बोडके, संतोष राठोड यांनी परिश्रम घेतले.
More Stories
आपल्या व्यवसायावर श्रद्धा ठेवा, पदानंतर ओळखणारी माणसेच खरी संपत्ती – डॉ.राजेश गोरे
मध्यवर्ती बसस्थानक,जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीर
“सदा सर्वकाळ शिक्षकांच्या अडी–अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिन” – शिक्षक आमदार विक्रम काळे