कळंब – 17 जून मुस्लिम धर्मियांचा सण बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर कळंब पोलीस स्टेशन येथे शांतता समिती सदस्य यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीस मार्गदर्शन करीत असताना पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी कळंब शहरात महामानव जयंती,सण उत्सव शांततेने व उत्साहाने साजरे होतात.शहराची ही परंपरा कायम राखावी,कायद्याच्या व नियमाच्या अधीन राहून सण उत्सव साजरे व्हावेत,सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज व अफवा पसरणारे व सामाजिक शांततेस बाधा आणणारे मेसेज फॉरवर्ड करण्या याविषयीची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे सामाजिक सलोखा व शांतता असेल तर गावचा विकास होतो असे सांगून बकरी ईद हा सण शांततेने साजरा करावा असे आवाहन करून ईद च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तर याप्रसंगी शांतता समिती सदस्य यांनी कळंब शहरात बकरी ईद शांततेने साजरी होईल असे सांगितले व आषाढी वारी निमित्त कळंब मार्गे हजारो वारकरी वारकरी पायी दिंडीतून पंढरपूर कडे जातात त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत याकडे लक्ष वेधले. प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक राम बहुरे यांनी केले.या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी ,डिकसळ ग्रामपंचायतचे सदस्य इम्रान मुल्ला, हुसेन शेख ,जिलानी कुरेशी,राहुल हौसलमल ,ह.भ.प महादेव महाराज अडसूळ ,प्रकाश भडंगे, सतीश तवले,विलास मिटकरी,माधवसिंग राजपूत ,बंडू ताटे ,शंभूराजे कोकीळ, अब्दुल बागवान ,इमरान शेख ,शब्बीर शेख यांच्यासह मौलाना ,मस्जिद ट्रस्टी ,ज्येष्ठ नागरिक,पोलीस मित्र, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पो.कॉ.श्रीराम मायंदे यांनी केले. तर दिनांक 16 जून रोजी पोलीस दलाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.
More Stories
शहरात श्री क्षेत्र गजानन महाराज पालखीचे आगमन व जल्लोषात स्वागत
मोहेकर महाविद्यालयांमध्ये ऑलिंपिक डे साजरा
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा