कळंब – कळंब येथील रहिवासी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बीड येथे व्यवस्थापकीय अधिकारी म्हणुन राहिलेले एजाज मणियार यांची दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी सेवानिवृत्ती झाली आहे. मणियार यांनी इन्शुरन्स कंपनीमध्ये आपली २८ वर्षाची सेवा ३१ ऑक्टोबर १९८६ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत पूर्ण केली आहे व मणियार हे दिनांक २८ मे रोजी हज यात्रेसाठी रवाना होत आहे. त्यानिमित्त त्यांचा वर्गमित्र परिवाराच्या वतीने अभय देवडा, विक्रम गायकवाड ,बाबू पोळ ,अशोक माळी, शरद खंदारे ,माधवसिंग राजपूत यांनी शाल ,बुके देऊन सत्कार केला व त्यांना हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड