कळंब- शहरातील नगर पालिकेच्या दुर्लक्षांमुळे चोंदे गल्ली जुन्या पोस्ट ऑफिस समोर नालीतील पाणी प्रत्येक बोळीत जात आहे.त्यामुळे लहान मुलांना सुद्धा घराबाहेर पडणे शक्य होत नाही. शहरातील नगर पालिकेच्या प्रशासनास इथल्या रहिवाशांनी त्याबाबत अर्ज करून ही वस्तुस्थिती कळविण्यात आली होते तरी सुद्धा नगर पालिकेस या बाबींकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सोनार गल्लीतील जुन्या पोस्ट ऑफिस समोरील नाली साफसफाई करून पाणी काढून देण्यात यावे नगरपालिका मुख्याधिकारी यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यावर लक्षच नाही.फक्त नगरपालिकेचे कर्मचारी सध्या त्यांच्या वैयक्तिक व्यवसायाकडे लक्ष देऊन नागरिकाची हेळसांड करत आहेत व शेवटी नगरपालिकेचे कर्मचारी मार्च मध्ये नगरपालिकेचा कर भरणा करून घेणे बाबत जनतेला त्रास देत आहेत असे येथील रहिवासी मोहन कोलंगडे यांनी म्हटले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी