August 9, 2025

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून ग्रामविकास साधावा – तहसीलदार प्रियवंदा म्हाडदळकर

  • कळंब (अरविंद शिंदे यांजकडून ) – विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जिद्द व चिकाटीने अभ्यास करून यश संपादित करावे.सेवा हाच धर्म मानून समाजाची आणि राष्ट्राची सेवा करावी तसेच स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून प्रथम स्वतःचा नंतर गावाचा आणि नंतर देशाचा विकास करावा असे आवाहन तहसीलदार प्रियवंदा म्हाडदळकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मौजे डिकसळ येथील शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दि.१७ जानेवारी २०२४ रोजी केले.
    कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
    यावेळी व्यासपीठावर प्रमुख उ्दघाटक म्हणून तहसीलदार प्रियवंदा म्हाडदळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक
    सुरेश साबळे व प्रमुख उपस्थिती मध्ये ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर आणि प्रो.संजय कांबळे, अधिसभा सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार उपस्थित होते. सुरेश साबळे यांनी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा बरोबरच उद्योगधंद्याच्या क्षेत्रात देखील आपले करियर घडवावे असे यावेळी मार्गदर्शन केले तसेच मोबाईलचा वापर हा आपल्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी करावे असे आवाहन केले, तर प्रो.संजय कांबळे यांनी ग्रामीण भागातील गरिबी ,दारिद्र्य, शाळांची परिस्थिती व पालकांची परिस्थिती यावर प्रकाश टाकत तरुणांनी समाजसेवेचे वृत्त अंगी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करून त्यामध्ये यशस्वी व्हावे असे आवाहन केले.
    अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी विद्यार्थ्यांनी पदवीच्या प्रथम वर्षापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करून जीवनात यशस्वी व्हावे तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिराच्या माध्यमातून स्वतःचे जीवन संस्कारमय घडवावे असे आवाहन त्यांनी केले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नामानंद साठे यांनी तर प्रास्ताविक डॉ.मीनाक्षी जाधव व आभार प्रदर्शन लेफ्टनंट डॉ. हरिभाऊ पावडे यांनी केले.या वेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.संदीप महाजन व अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा .अर्चना मुखेडकर,प्रा सरस्वती वायभसे, प्रो.ज्ञानेश चिंत्ते, प्रो.दादाराव गुंडरे, प्रो.दीपक सूर्यवंशी, डॉ.कमलाकर जाधव, डॉ.दत्ता साकोळे ,डॉ. सुरेश वेदपाठक,डॉ.नागनाथ आदाटे ,डॉ. ईश्वर राठोड,डॉ श्रीकांत भोसले, डॉ.विश्वजित मस्के, प्रा.दीपक वाळके, प्रा. सुशील जमाले, प्रा.शाहरुख शेख, प्रा.मेहराज तांबोळी ,डॉ.बालाजी वाघमारे,डॉ.समाधान चंदनशिवे, प्रा. अमोल शिंदे,डॉ.अमरसिंह वरपे, प्रा.राम दळवी,प्रा.मारुती शिंपले,डॉ.परमेश्वर वाकडे,प्रकाश गायकवाड,हनुमंत जाधव अधीक्षक तथा तंटामुक्ती समिती अध्यक्ष डिकसळ, सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे, विनोद खरात,संतोष मोरे ,अनिल पवार, रमेश भालेकर,अमोल सुरवसे, अभिमन्यू हाके, इकबाल शेख, अर्जुन वाघमारे, दिलीप शिंदे, कमलाकर बंडगर,संदीप सूर्यवंशी, व तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!