उमरगा – समाज संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कळंब तालुक्यातील सातेफळ,हळदगाव आणि सौंदाना परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला. एकूण ३०० रेशन किटचे वाटप करून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली. ही मदतकार्य मोहीम उत्तरदायित्व एनजीओ फाउंडेशन,महाराष्ट्र लोकविकास मंच आणि समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली.या कार्यात महावीर डोके आणि त्यांचा मित्रमंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी भूमिपुत्र वाघ,विद्या ताई वाघ,हरिश्चंद्र ढाकणे,मनीषाताई गुंजाळ,मारुती शिरसाट, मनीषाताई घुले,विकास कुदळे, शीतल गहेरवार,प्राचार्य वेंकट अणिगुंठे आणि ॲड.दिलीप कांबळे यांची उपस्थिती लाभली. या उपक्रमामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाज संस्थांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड