कळंब – कळंब तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग हा नेहमिच या- ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असुन तालुक्यातील सर्वच ग्रामीण रस्त्याचे ‘तिन तेरा’ वाजलेले असताना कुठल्याच रस्त्याकडे संबंधित अधिकारी स्वतः लक्ष देत नसल्याने रस्त्यांची कामे दिरंगाई ने निकृष्ट दर्जाची होत असल्याने तालुक्यातील जनता हैराण झाली असुन फक्त गुत्तेदार जगवायचे कार्यक्रम सद्यस्थिती चालू असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. कळंब तालुक्यातील आनेक गावचे रस्ते हे चाळणी सारखे झाले आहेत.त्यामुळे खड्डे चुकवता वाहणं चालकांना कसरत करावी लागत आहे. तर आनेक वेळा अपघात ही होत आहैत.त्यामुळे झालेल्या अपघातास जबाबदार कोण?असा प्रश्न नागरीकांसमोर निर्माण होत आहे.तर एखाद्याचा मृत्यू झाल्यास या घटनेस जबाबदार कोणाला धरावे?असाही दुसरा प्रश्न निर्माण होत आहे. तर गेल्या काही महिन्यातली तालुक्यातील खामसवाडी-मंगरुळ-पिंपळगाव या सह अनेक गावातील रस्त्याची डागडुजीची कामे झालेली आहेत. परंतु सद्यस्थितीत कामे होऊन देखील सर्व खड्डे मोठया प्रमाणात उखडले आहेत.त्यामुळे केलेली सर्वच कामे हे बोगस झाली असल्याची चर्चा नागरीकांमधुन होत आहे. तर पुन्हा खड्डे दुरुस्ती करावी अशी ही मागणी होत आहे. त्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने वरील सर्व कामांची चौकशी करुन संबंधित गुत्तेदार यांच्या वर कार्यवाही करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम उप विभागीय अभियंता कळंब यांना दि. ६ मे २०२५ रोजी निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. या मागणी मध्ये रामगड पाटी, मोहा ते खामसवाडी या रस्त्याचे पॅचवर्क चे काम निकृष्ट दर्जाचे केलेलं असुन शासनाने लाखो रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे. असं स्पष्ट निवेदनात दिलेले असतानाही सदरील निवेदनावर सार्वजनिक बांधकाम उप विभागीय अभियंता यांनी कसल्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याने व निवेदनात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असतानाही कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने किंवा नोटीस ही दिली नसल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागास उप विभागीय अभियंता यांची भेट घेण्यासाठी गेल्यास उपविभागीय अभियंता हे कार्यालयात उपस्थित नसल्याने दि.२० मे २०२५ रोजी त्यांच्या कॅबीनच्या दरवाज्याला चपलांचा हार व दरवाजाला काळे लावून छावा स्टाईल ने आंदोलन करुन घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव, धाराशिव तालुका संघटक अभिषेक गरड,कळंब तालुका विध्यार्थी आघाडी उपाध्यक्ष आदित्य यादव, दिपक वाघमोडे, ज्ञानेश्वर पाटुळे, किशोर कांबळे ,रोहन पाटुळे, संतोष ताटे या प्रसंगी उपस्थित होते.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा