कळंब – विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांच्या परिपत्रकान्वये नागरीकाडून शेतरस्ते/पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण बाबतच्या बहुतांशी तक्रारी प्राप्त होत असल्याने नागरीक / शेतकरी यांच्याशी थेट संवाद साधण्याकरीता दर महिन्याच्या दुस-या व चौथ्या शुक्रवारीसस्ती अदालत आयोजीत करण्या विषयी सुचना जिल्हाधिकारी धाराशिव यांनी दिल्या असून दि.२९.०४.२०२५ रोजीच्या पत्रान्वये प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या शुक्रवारी तालुकास्तराव सस्ती अदालतआयोजित करण्यात येणार आहे. सदर अदालतीमध्ये संबंधित नागरिक यांचे शेतरस्ते / पानंद रस्त्यावरील अतिक्रमण काढणे याबाबतची प्रकरणे याबाबत सर्व संबंधित शेतकरी यांचे सोवत चर्चा करून तसेच समुपदेशन करून सामंजस्याने निकाली काढणे बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानुसार कळंब तालुक्यातील ज्या अर्जदार यांनी रस्ते किंवा पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण बाबते तह-सील कार्यालयाकडे यापुर्वी अर्ज दाखल केले आहेत अशा प्रकरणात संबंधीत अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपसातील सामंजस्याने सदरील प्रकरण मिटणारी असल्यास संबंधीत सर्व अर्जदार व गैरअर्जदार यांनी सदर अदालतीस उपस्थित राहावे.असे आवाहन कळंबचे तहसीलदार तथा सस्ती अदालत अध्यक्ष हेमंत ढोकले यांनी केले आहे.या सस्ती अदालत तालुकास्तरीय समिती संरचना खालील प्रमाणे करण्यात आली आहे. तहसीलदार (अध्यक्ष),गटविकास अधिकारी (सह अध्यक्ष),सदस्य. उपाध्यक्ष भूमी अभिलेख,उप अभियंता बांधकाम विभाग जि. प.,वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलीस निरीक्षक / उपनिरीक्षक व सदस्य सचिव म्हणून नायब तहसीलदार महसूल हे राहतील.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा