(जीवेत् शरद् शतम्.२४ एप्रिल २०२५ ) लोकनेते आदरणीय किसन कथोरे,( आप्पा) आमदार मुरबाड विधानसभा,यांचे स्विय्य सहा.जालिंदर सावंत साहेब वाढदिवसाच्या अंत:करणापासून शुभेच्छा देताना मन भरून आले, विठ्ठलाचा भक्त कसा असावा तर तो केवळ आणि केवळ आपल्यासाऱखा.! जिंदादिली का दुसरा नाम “जालिंदर सावंत”, साहेब.! माझ्या तीस वर्षाच्या कारकीर्दीत केंद्रातील अन् महाराष्ट्राच्या विधीमंडळातील बरेच खाजगी, सरकारी, स्विय सहाय्यक (पी. ए.) पाहिले.प्रामुख्याने राष्ट्रपती भवनातील दत्ता मॅडम, राजभवनातील काशीकर साहेब,मा. शरद पवार साहेब यांचे कोकाटे सर,तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सहाय्यक ज-हाड साहेब,भिसे साहेब लोंढे साहेब,डॉ.सादले साहेब, तत्कालीन आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे,अविनाश देशमुख,ना. आठवले यांचे प्रवीण मोरे , जगन्नाथ पाटील साहेब यांचे हुवाळे ,सामाजिक न्याय विभागातील सावंत, प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा मंत्री रविंद्र चव्हाण क् यांचे कांबळे साहेब,ना.अमित (भैय्या) देशमुख, गुंजकर साहेब, जोशीजी, आणि आदरणीय किसन कथोरे आप्पांचे स्विय सहाय्यक “जालिंदर सावंत साहेब”!, सामान्य माणसाला अभिमान वाटावा असेच, कायम सकारात्मक व्यक्तीमत्व ! लोकनेते आदरणीय किसन कथोरे आप्पा जनसंपर्क कार्यालयात नसतील तर,आलेल्या व्यक्तीचे समाधान होणारच, दिलेला शब्द पाळणारे,आज या उद्या या, असे नाहीच,समोरून सबंधित व्यक्तीला फोन करणारे साहेब,एवढेच नाही तर,अभ्यागतानां स्वतः चहा बनवून देणारे “सावंत साहेब” स काही माणसे रोज भेटत असतात.पण सहपथिक म्हणून ,आमच्यासारख्याला लाज वाटते हो.”साहेब” ? ख-या रत्नाची पारख रत्नपारख्यालाच असते.बाकीच्यानां काय त्याचे?महाराष्ट्राच्या विधिमंडळातील अभ्यासू व्यक्तीमत्व अर्थात आप्पानां लोकनेता बनविण्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे सावंत साहेब असे मी, समजतो.लक्षवेधी असो,की, तारांकित प्रश्न? बारवी धरणग्रस्त असो, की अवर्षणातील पूरग्रस्त शेतकरी,कोकण भवन असो की, जिल्हा नियोजन कार्यालय ठाणे, नगरपरिषदेतील भोंगळ कारभार.! आदरणीय “आप्पांचा” अव्वल कार्यअहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्विय सहाय्यकाच्या टेबलावर पाहताना आम्हाला आपल्यातल्या पूर्णत्वाची जाणीव झाली.मतदार याद्या मुरबाड तहसील कार्यालयात देवून परत येतानां आपण अति धावपळीत आपल्याच द्विचाकीवरून परतताना जायबंदी झालात,नव्हे पुनर्जन्मच म्हणा नां..काळी दिवाळी आपली ,माझ्या स्मरणातून आजही जात नाही.साहेब,रिकामटेकडया कॅलेंडरवरचे चित्र वे़ग़ळं, पण सजग प्रशासकीय अनूभव म्हणून आपले सचित्र जतन करतोय.२४ एप्रिल १९७७ ते २४ एप्रिल २०२५..अठेचाळीस वर्षाचा जीवन संघर्ष आम्ही ऐकून आहे.तीर्थरूप “मनोहर दादा व आवडामाय” अर्थात आईबाबांचा आशिर्वाद अन् सहचारिणी सौ.सतशिला अर्थात बाईसाहेब यांची खंबीर साथ.! आदरणीय आप्पा,आदरणीय नानींचा आशिर्वाद आहेच,तशी दीपक दादांची, उत्तमशेठ विशे,साकिब भाई गोरे, मिलिंद धारवाडकर यांची सहानुभूतीही..”साहेब” शाश्वत शुभेच्छाच माणसाला कामी येतात बाकी नश्वर आहे.कोरोना काळात शहर गावं शांत होती पण आपण अविश्रांत मेहनत करीत होतात, आज आपण ४९ व्या वर्षात तासाभरात पदार्पण करीत आहात ..निरोगी व उदंड आयुष्य देणा-या नियतीला मागणे सुवर्णमहोत्सव , ही दणक्यात साजरा व्हावा.
जय शिवराय! जयभीम!
@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे, उपसंपादक सा.साक्षी पावनज्योत, ठाणे जिल्हाध्यक्ष रूग्णहक संघर्ष समिती, जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सोशल मीडिया ठाणे जिल्हा ग्रामीण, विशेष कार्यकारी अधिकारी (SEO)+९३२४३६६७०९
More Stories
उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश;अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड
प्रेरणा फाउंडेशनचा मोफत आरोग्य शिबीर व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा धुमधडाक्यात साजरा
खो-खो विश्वचषक महिला संघातील अष्टपैलू खेळाडू सन्मानित