धाराशिव (जिमाका) – २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पार पडत असून,धाराशिव जिल्ह्यातील ७५ टक्के पशुगणना पूर्ण झाली आहे.पशुपालकांनी आपल्या सर्व पशुधनाची अचूक माहिती प्रगणकांकडे नोंदवावी.असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पशुगणना ३१ मार्चपर्यंत पूर्ण करायची आहे.जिल्ह्यातील ८९८ गावे आणि शहरी प्रभागांपैकी ६७२ ठिकाणी (७५ टक्के) पशुगणना पूर्ण झाली आहे.उर्वरित २५ टक्के गणना वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सूचना दिल्या आहेत. पशुगणनेसाठी ११० प्रगणक आणि २४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.घरोघरी जाऊन गणना करणाऱ्या प्रगणकांना पशुपालक, शेतकरी आणि नागरिकांनी सहकार्य करावे,तसेच ज्या पशुपालकांनी आपले पशुधन किंवा शहरी भागातील पाळीव प्राणी नोंदवलेले नाहीत,त्यांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. पशुगणना १०० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी धाराशिव,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पशुसंवर्धन विभागाचे उप आयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले आहे.
More Stories
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी