कळंब- कळंब येथे दि.१४ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक संघटनेचा विस्तार वाढविणे बाबत घेण्यात आली.या बैठकीत वरील विषयांकीत प्रश्न चर्चेत घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामधे असे ठरले की,फुले, शाहू,आंबेडकर,आण्णा भाऊ,या विचार धारेवर कार्य करणारे तसेच महा ई सेवेच्या माध्यमातून सर्व स्तरातील गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तळमळीने झटणारे कार्यकर्ते बाबासाहेब टोपे यांच्या नेतृत्वाखाली कळंब तालुक्यातील गोरगरिबांना न्याय मिळावा,त्यासाठी कळंब तालुका अध्यक्ष पदांची धूरा देण्यात यावी,असे ठरले त्यानुसार बाबासाहेब टोपे रा.सावरगाव (पु),ता.कळंब जिल्हा धाराशिव यांची कळंब तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज,या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिमरत्न,प्रा.बी.बी.शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.या निवडीमुळे बाबासाहेब टोपे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी