June 23, 2025

निराश्रीत,वेडसरांची सेवा करणारे मोहन तलकोकुल यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा मानाचा पुरस्कार जाहीर

  • कळंब – कोणतीही सामाजिक काम करण्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते.समाज काय म्हणेल,याकडे लक्ष न देता काम करत राहिल्यास,सामाजिक बदल होण्यास विलंब लागणार नाही.पैसा असो किंवा नसो प्रामाणिकता लक्षात आल्यानंतर समाजातील दानशूर व्यक्ती आपोआप पुढे येऊन लागेल ती मदत करत असतात.असाच एक, मोहन तलकोकुल हा ध्येयवेड माणूस सोलापूर येथील एका टॉवेल कंपनीत अल्प पगारावर मुनीम म्हणून काम करत आहे. दोन चार मित्रांना सोबत घेऊन सोलापूर,तुळजापूर,धाराशिव, पंढरपूर ,व अन्य ठिकाणी जाऊन रस्त्याच्या कडेला,रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर,वेडसर पुरुष महिला यांची स्वच्छता,मलम पट्टी,नाष्टा,जेवण,कपडे देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहे. मोहन यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन गेल्या सहा वर्षांपूर्वी एम.जे.प्रथम मानव सेवा संस्थेची स्थापना केली.त्यांचे हे काम पाहून कळंब तालुका पत्रकार संघाने या संस्थेला,स्वा.सै.स्व. शकुंतला देशपांडे समाजसेवा पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा.
    || सेवा हेच आमचे धर्म, समर्पण हीच वृत्ती || हे ब्रीद वाक्य समोर ठेवून गेल्या सहा वर्षा पासून सोलापूर,बार्शी,धाराशीव
    ,तुळजापुर,पंढरपुर येथे एम. जे.प्रथम मानव सेवा संस्था या नावाने मानव सेवा करीत आहोत.
    संस्थेच्या माध्यमातून मुख्यतः गरीब,बेघर,निराधार,निराश्रित मानवांची सेवा करणे कटिंग, दाढी व त्यांचे जखमावर मलमपट्टी (ड्रेसिंग) करणे त्यांना स्वच्छते सोबत अन्न,वस्त्र व निवारा मिळवून देण्यासाठी कार्यशील राहणे हा हेतू आहे.
    येणारा प्रत्येक सण संस्था या निराश्रित,निराधार लोकांना बरोबर साजरा करते.
  • अरोग्यशिबिर,वृक्षारोपण,देवी देवतांचे भंग पावलेले फोटोंचे विधिवत विसर्जन करणे, याशिवाय प्रत्येक ऋतु मध्ये निराधार व्यक्तींना जे गरज लागेल ते देवून त्यांची सेवा करतात .
    वेळोवेळी समाजास गरज भासेल तशी हि संस्था,समाजातील दानशुर व्यक्तींच्या माध्यमातून, जमेल तितकी मदत करीत आहेत.मित्र मंडळी मिळून हे काम स्वःखचनि व समाजातील काही दानशूर व्यक्तींच्या सहकायनि करत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मोहन तलकोकुल यांनी सांगितले.
    येणा-या काळात यांना यांच्या हक्काचं निवारा मिळावा यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.
    या संस्थेचे अध्यक्ष मोहन तलकोकुल हे टॉवेल कारखाना सोलापूर मध्ये मुनिम म्हणून काम करत आहेत.
    अल्पशा पगार असताना हि कुटुंब चालवून ते सामाजिक काम करीत आहेत.
    संस्थेचे सेवाकार्य गेल्या पाच वर्षापासुन निराधार,निराश्रित बांधवानसाठी सेवाकार्य सुरु केल आहे.
    आता पर्यंत या संस्थेने शेकडो निराश्रीत वेडसर पुरुष महिलांची काळजी घेवून,त्यांना त्यांच्या घरी सोडले आहे,तर ज्यांना नातेवाईकांनी नाकारले त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडले आहे. या कामाला आमचा सलाम…
error: Content is protected !!