नागपूर (प्रविण बागडे ) – संविधान चौक,नागपूर येथे शुक्रवार,२५ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११:०० ते ११:३० वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण पश्चिम मतदार संघातून नामांकन फॉर्म भरण्यासाठी निवडणूक आयोग, नागपूर येथे जात असताना सर्व प्रथम संविधान चौक,नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यास आले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,चंद्रशेखर बावनकुळे,मोहन मते व इतर भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी,सर्व कार्यकर्ते व आंबेडकरी समाजाचे नेते जोगेंद्र कवाडे,जयदीप कवाडे,सुलेखा कुंभारे आणि डॉ.मिलिंद माने उपस्थित असून त्यांच्या सोबत हजारोच्या संख्येने कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन व अभिवादन करण्यास नागपूर पोलीस बंदोबस्त सहित आलेले होते. भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधान निर्माता परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जशे माल्यार्पण केले तसेच भाजपच्या कार्यकर्त्यानॆ तेथे जय श्री रामच्या घोषणा मोठं-मोठ्या आवाजात दिल्यात व सर्व उपस्थित नेते व कार्यकर्त्यानॆ समर्थन देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला.एवढंच नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी तेथे जास्त जमल्याने काही कार्यकर्ते हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जो बाग-बगीचा बनविला असून तेथे जी स्टीलची रेलिंग लावलेली होती,त्या रेलिंगवर भाजप चे कार्यकर्ते जबरन बसलेले होते, त्यांच्या वजनाने ती रेलिंग जमिनीपासून उखडून व तुटून गेली. एवढेच नाही तर काही कार्यकर्त्यांनी तेथे लावलेले पंचशील ध्वज हि वाकडे-तिकडे केले तर काही कार्यकर्ते व फोटोग्राफरने त्यांच्या पायातील जोडे-चप्पल घालूनच डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ गेले व अमानवीय कृत्य केले. हिंदू धर्माचा त्याग करून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी, दीक्षाभूमी,नागपूर येथे ५ लाख अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकार करून २२ प्रतिज्ञा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतल्या.त्यापैकी २ री प्रतिज्ञा “मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही”, हे भाजपाच्या कार्यकर्त्यांना व उपस्थित सर्व नेत्यांना माहिती असून देखील जय श्रीरामच्या घोषणा देऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि लाखो करोडो बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्यात व आचार संहिता भंग केली.आंबेडकरी समाजाचे नेते जोगेंद्र कवाडे,जयदीप कवाडे,सुलेखा कुंभारे आणि डॉ. मिलिंद माने उपस्थित असून देखील या नेत्यांनी या घटनेचा विरोध केला नाही आणि मूकबधिर झाले. वरील घटना हि सर्वप्रथम सुदर्शन बागडे, न्युज नागपूर डिजिटल या YouTube चॅनेल ने वायरल केल्याने इतर बौद्ध बांधवाना व तमाम आंबेडकरी जनतेला माहिती मिळाली. शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४ रोजी, संविधान चौक येथील समितीच्या सदस्यांनी सीताबर्डी पोलीस ठाणे, नागपूर येथे तक्रार करण्यास गेले असता त्यांना परत पाठविल्या गेले. रविवार, २७ ऑक्टोबर, २०२४ रोजी नागपूर शहरातील तमाम आंबेडकरी जनता व संविधान प्रेमी व विविध संघटनेच्या नागरिकांनी संविधान चौक, नागपूर येथे येऊन शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४ रोजी, सकाळी ११:०० ते ११:३० वाजताच्या दरम्यान घडलेल्या घटनेचा आंबेडकरी जनतेने जाहीर निषेध केला. दुपारी १:०० वाजताच्या दरम्यान नागपूर शहरातील दीक्षाभूमी बचाव संघर्ष समिती, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संयुक्त उत्सव समिती,संयुक्त रिपब्लिकन आघाडी,आक्रमण युवक संघटना,भीमगर्जना सामाजिक संघटना,समता सैनिक दल या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सीताबर्डी पोलीस ठाणे,येथे परत जाऊन गंभीर लेखी तक्रार केली. संविधान चौक हे नागपूर शहरातील झिरो माईल जवळ येत असल्याने येथून सकारत्मक ऊर्जा हि संपूर्ण जगात पसरत असते. संविधान निर्मात्याचा अपमान म्हणजेच भारतीय घटनेचा अपमान होय. संविधान चौक,नागपूर येथील डॉ.बाबासाहेबांचा पुतळा हा राष्ट्रीय स्मारक असल्याने येथे भाजप नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले अमानवीय कृत्य हे गंभिर व दखलपात्र स्वरूपाचे असून यावर आरोपींवर तात्काळ FIR दर्ज होणे गरजेचे होते तरी देखील अजून पर्यंत FIR दर्ज केलेली नव्हती म्हणून तमाम नागपूरच्या जागृत व जबाबदार नागरिकांनी व विविध संघटनांनी मिळून पोलीस ठाणे, सीताबर्डी,नागपुर येथे लेखी गंभीर तक्रार दिली व तात्काळ FIR दर्ज करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी चंद्रशेखर चकाटे याना वारंवार विनंती केली असता वरिष्ठांना याची माहिती द्यावी लागते असे बोलून २ तास जनतेची टाळाटाळी केली. त्यानंतर दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास राहुल मदने,पोलिस उपायुक्त (DCP) नागपूर शहर हे सीताबर्डी पोलीस ठाणे येथे प्रत्यक्ष आले व तमाम आंबेडकरी जनतेला सांगू लागले कि, आम्हाला नियमाप्रमाणे ७ दिवस लागतात,चौकशी झाल्यानंतरच आम्ही FIR दर्ज करत असतो. नागपूरच्या जनतेने केलेल्या वारंवार विनंती वरून व जनतेचा असलेला तीव्र निषेध बघून DCP यांनी ३ दिवस मागितले असता नागपूरचे कायदे तज्ञ् मंडळी अँड. विलास राऊत,अँड. स्मिता कांबळे, व इतर सर्व कार्यकर्ते तेथे उपस्थित झाले आणि अनुसूचित जाती आणि जमाती साठी असलेल्या ऍट्रॉसिटी ऍक्ट १९८९ कलम ३ अनुसार आमच्या धार्मीक स्थळाचे नुकसान करून आमच्या धार्मिक भावना दुखविल्यात. हि तक्रार ऍट्रॉसिटी ऍक्ट देखील या मध्ये लागू होतो, त्या अनुषंगाने तक्रार हि गंभीर व दखलपात्र स्वरूपाची असल्याने तात्काळ FIR दर्ज करावी अशी विनंती केली असता DCP साहेबानी परत १ दिवस वेळ मागितला असता या प्रकरणाची चौकशी लगेच सुरु करतो आणि सुधीर नंदनवार, सहायक पोलीस आयुक्त (ACP) यांना देतो व नंतर FIR दर्ज करतो असे आश्वासन आंबेडकरी जनतेला दिले. जनतेच्या घेराव झाल्याने, ठाणे दैनंदिनी क्र. ०४१, दि. २७ ऑक्टोबर, २०२४ रोजी, ठीक १९:४४ वाजता दर्ज केला. जवळ जवळ ७ तासानंतर नागपुर पोलिस कामाला लागले. सोमवार, २८ ऑक्टोबर, २०२४ रोजी, संविधान चौक, नागपूर या घटनास्थळी पोलीस तपास अधिकारी यांनी पंचनामा करून उपस्थित नागरिकांचा बयान घेतला आणि कायदेशीर कार्यवाही करण्यास सुरुवात केली. मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४ रोजी, ज्ञानज्योती भन्ते व त्यांचा संघ यांनी २५ ऑक्टोबर ला घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करून भाजपा हे आतंकवादी संघटन आहे व जातीवाद करते असा आरोप भाजपा पक्षावर वर लावला आणि नाराजी व्यक्त केली. तरी देखील सीताबर्डी पोलीस ठाणे, नागपूर यांनी अजूनही आरोपींविरुद्ध व भाजपा पक्षा विरुद्ध FIR दर्ज केलेली नाही. करिता आंबेडकरी जनता जनआंदोलन करेल असे पोलिसांना सांगण्यात आले.
More Stories
पर्यावरण दिनानिमित्त माफसूच्या संचालनालय विस्तार शिक्षण येथे वृक्षारोपण
शाश्वत पशुपालनासाठी कुरण विकास व्यवस्थापन महत्वाचे – डॉ. नितीन पाटील, कुलगुरु माफसू
मानवी कल्याणासाठी युध्द नाकारणारा – सम्राट अशोक !