धाराशिव – भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत दिअकोला येथे महाराष्ट्र डेमोक्रॅ.२१ ऑक्टोबर २०२४ रोजी टिक फोरमच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती.इतर वक्त्यांची भाषणं झाल्यावर प्रेक्षकांपैकी काही जणांनी ‘आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत’ असे म्हणून आरडाओरडा सुरू केला. “आम्ही उत्तरे देऊ,सर्व भाषणे होऊ देत.”अशी भूमिका भारत जोडो अभियानाच्या नेत्यांनी घेतली. मात्र ते न ऐकता काही जण विचारमंचावर चढले,त्यांनी माईक ताब्यात घेतला आणि हुल्लडबाजी सुरू केली.ज्या वेगाने हे घडले,त्यावरून ही कृती पूर्वनियोजित असावी असे वाटते. त्यांनी योगेंद्र यादव यांना बोलूही दिले नाही व सभा उधळून लावली. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध सर्व स्तरातून झाला पाहिजे असे आवाहन स्वराज इंडियाचे सदस्य प्रा.अर्जुन जाधव,सुभाष लोमटे,सागर जाधव,सुभाष घोडके,सुरेश शेळके,इंजि. तुकाराम मचे इत्यादींनी केले आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक