धाराशिव(जिमाका)- महिलांचे आर्थिक नियोजन हे कुटूंब सांभाळण्यासाठी महत्वाचे आहे. कुटूंबाला आर्थिकदृष्टया उभे करण्यासाठी घरातील महिला सक्षम आहेत.शासन महिलांच्या पाठिशी उभे आहे.त्यांच्यासाठी विविध योजना राबवत आहे.या योजनांचा महिलांनी लाभ घेऊन त्यांना आर्थिकदृष्टया सशक्त बनविण्यासाठी प्रशासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभे आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले. दि.९ ऑक्टोबर रोजी धाराशिव येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमातंर्गत जिल्हास्तरीय महिला मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत डॉ.ओम्बासे बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय जाधव,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले,मिरगणे,राऊत,प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे, शिक्षणाधिकारी सुधा सांळूके,जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी डॉ.पुजारी,माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी,उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी माधव सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे म्हणाले, शासन महिलांना सक्षम बनविण्यासाठी विविध येाजना राबवत आहे.त्यापैकी महत्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील ४ लाख बहीणींना याचा लाभ देण्यात आला आहे.या योजनेतून ज्या बहीणींचा आधार सिडींग बँक खात्यावर जमा झाला नाही त्यांच्यासाठी आधार सिडींगबाबतचे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच महिला आर्थिक नियोजन योग्य पध्दतीने करतात.यामुळे शासनानेही त्यांच्याच खात्यावर लाभ दिला. मिळणाऱ्या लाभाचा उपयोग महिलांनी त्यांच्या आरोग्य,मुलांना चांगले शिक्षण व कौशल्ययुक्त शिक्षण देण्यासाठी करावा.असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा प्रशासन संपूर्ण सहकार्य करेल असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी विविध विभागातून लाभ मिळालेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये मुख्यमंत्री लाडीक बहीण योजनेतील ५ लाभार्थी महिला,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून लाभ घेतलेल्या ५ महिला लाभार्थ्यांचा,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील २ लाभार्थ्यांचा, माविमच्या माध्यमातून लाभ घेतलेल्या ३ महिलांचा,५ यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सविता दुधभाते यांनी केले.उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी सुधा साळूंके यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बालविकास विभागातील परिविक्षा अधिकारी व्यंकट देवकर,पंढरीनाथ घोडके, अरविंद थोरात,विधी सल्लागार शशीकांत पाटील,जिल्हा संरक्षण अधिकारी भुजंग भोसले,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे, संरक्षण अधिकारी विभावरी खुने, सतीश तोडकर,कार्यालयीन सहाय्यक शैलेश खारगे,चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक विकास चव्हाण,केस वर्कर देवकन्या हिंगले,क्षेत्रीय कार्यकर्ती जयश्री पाटील,समुदेशक कोमल धनवडे आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन