वर्धा (प्रत्युष बाबा ) – लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यात मिळवलेलं मर्यादित यश असले तरी पण आता विधानसभा निवडणुकीत दगाबाजी व बेकायदेशीररित्या लादलेलं भाजपा च सरकार घालवून महाविकास आघाडीला संपूर्ण यश मिळवण्याचा बैठकीत निर्धार करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १२५ च्या वर जागांवर महाविकास- आघाडीला सहकार्य करणार असल्याचा ठराव भारत जोडो अभियानाच्या राज्य बैठकीत करण्यात आला.
भारत जोडो अभियानाच्या स्वाभिमानी,समृद्ध,समतावादी व सहिष्णू महाराष्ट्र निर्मितीसीठी भारत जोड़ो अभियान ची कटिबद्धता ही दि.९ ते १५ ॲागस्ट २०२४ दरम्यान राज्यभर नफरत छोडो – भारत जोडो अभियान ९ ॲागस्ट २०१४ला मुंबईत ॲागस्ट क्रांती मोर्चा आयोजित केला आहे.
भारत जोडो अभियान पुढील मागण्या घेवून महाराष्ट्रात केंद्र व राज्य सरकार हिसाब करो – जबाब दो म्हणुन अभियान राबवणार आहे.
टॅक्स रुपाने व औद्योगिक उलाढालीत राज्याचा वाटा राज्याला मिळालाच पाहिजे,नवे प्रकल्प परराज्यात न जाऊ देता राज्याचा विकास हवा,भारत जोडो अभियान करणार महाविकास आघाडीचे समर्थन मात्र जनतेच्या जाहीरनाम्याला पाठींबा देण्याची अट,शेतकरी – कामगार व कष्टकऱ्यांचा घसरलेला संयुक्त महाराष्ट्र पुन्हा सावरु या,भाजपाच्या दस्तुरखुद्द अयोध्येतील परभवाने सांप्रदायिक धार बोथट होतेय व राज्यातही दलित आदिवासी ओबिसी व अल्पसंख्यंकांना न्याय हवा.ओबिसी विरुद्ध – मराठा लढाई राज्यासाठी भाजपाचा घातक खेळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बैठकीत अभियानच्या विभागीय समित्या जाहीर विदर्भ समन्वयक – अविनाश काकडे,रुबिना पटेल, प्रशांत ठाकरे,मराठवाडा- सुभाष लोमटे,दत्ता तुमवाड कोकण – मुक्ता श्रीवास्तव, राजन इंदुलकर,पश्चिम महाराष्ट्र – मानव कांबळे, संदीप बर्वे,उत्तर महाराष्ट्र – अविनाश पाटील, जालिंदर अडसुळे.प्रदेश प्रशिक्षण समिती – राजू भिसे, प्रो. नूतन माळवी, निश्चय म्हात्रे,महाराष्ट्र समन्वयक – उल्का महाजन, ललित बाबर, संजय मंगला गोपाल हे असणार आहेत.
वर्धा येथील तीन दिवशीय झालेल्या बैठकीचे सर्व नियोजन हे भारत जोडो अभियानचे विदर्भ समन्वयक अविनाश काकडे यांनी केले.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा