कळंब – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व ९ उमेदवार विजयी झाल्याबद्दल कळंब येथे दि.१२ जुलै २०२४ महायुतीच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करून मोठा जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते,राष्ट्रवादी शहराध्यक्ष दत्ताजी तनपुरे,अरुण चौधरी,हनुमंत शेळके,हर्षद अंबूरे, माणिक बोंदर,मकरंद पाटील,नारायण लांडगे,संजय जाधवर,उमेश बोंदर,किशोर भाऊ वाघमारे,राजेंद्र बिक्कड,विकास कदम,मुबिन मणियार,काका भडंगे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष राहूल हौसलमल,राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब खंडागळे,इम्रान मुल्ला,पिनु जाधवर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच
“जगाला युद्धाची नव्हे,बुद्धाची गरज” – बौद्धाचार्य सुनील गायकवाड