कळंब – मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे दिनांक ८ जून २०२४ पासून सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळे सोयरे अध्यादेश काढावा या इतर मागण्यासाठी अमरण उपोषण करीत आहेत. उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. सरकारने याची तात्काळ दखल घेऊन त्यांचे उपोषण सोडण्याचा प्रयत्न करावा अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळंब उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर सकल मराठा समाजाच्या वतीने अतुल गायकवाड ,अॕड,मनोज चोंदे, संजय होळे ,बालाजी मुळे, अशोक चोंदे ,प्रवीण जाधव, राहुल यादव,संतोष चव्हाण, प्रतीक गायकवाड,विशाल पवार ,विकास गडकर,पंडित गोडगे,नितीन काळे ,मीरा चोंदे ,ज्योती सपाटे यांच्या सह्या आहेत.
More Stories
कळंब नगर परिषदेच्या ७२ कोटींच्या वार्षिक अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात विविध उपक्रमांची मेजवानी
डीजे-डॉल्बी मुक्त रामनवमीचा संकल्प;अध्यक्षपदी प्रसन्न हुलसुरकर यांची धुरा