- धाराशिव (जिमाका) – सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली येथे 29 जुलै ते 03 ऑगस्ट या कालावधीमध्ये विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहेत.
जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित आहेत, ती तडजोडीने मिटावी अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकते.लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभाग घेवू शकतात. - विशेष लोक अदालतीचे फायदे :-
साध्या व सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो.झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणार असते.वेळेची व पैशाची बचत होते.तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते. जिल्हयातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालती ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान