न.प.च्या कर्तव्यदक्षतेने, भाजी-पाला बाजाराचे योग्य नियोजन..!
कळंब (महेश फाटक ) – येथील रविवारचा भाजी-पाला बाजार जुने पोलीस स्टेशन ते बार्शी रोड पर्यंत रहदारीच्या रस्त्यावरच भरत असल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याने भाजी-पाला घेणाऱ्यांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत होती.याकडे न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते.रोडच्या एका बाजूला स्टेडियमचे मैदान तर दुसऱ्या बाजूला न.प. शाळा क्र.१ चे मैदान रिकामेच होते.साक्षी पावन ज्योत मधून होत असलेल्या गैरसोयीबद्दल न.प.प्रशासनाचे लक्ष वेधले असता अवघ्या पंधरा दिवसांत न.प.प्रशासनाने योग्य नियोजन करून न.प.शाळेच्या मैदानात बाजार भरवला असल्याने नागरिकांना आता स्वच्छंदपणे भाजी-पाला खरेदी करत येऊ लागल्याने समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याने सा.साक्षी पावन ज्योतकडून न.प.प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी