कळंब –भारतीय संविधानाला येत्या प्रजासत्ताक दिनी ७५ वर्षे पूर्ण होत असलेल्या ऐतिहासिक पर्वानिमित्त दयावान प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “संविधान अमृत महोत्सव” राज्यभर अधिकृत स्वरूपात साजरा करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात भारतीय संविधान हे जगातील सर्वात लोकशाहीप्रधान, समतेवर आधारित आणि नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाची हमी देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले. संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना हा महोत्सव केवळ औपचारिक न राहता लोकचळवळ म्हणून साजरा व्हावा, अशी भूमिका प्रतिष्ठानने मांडली. निवेदनातील प्रमुख मागण्या — सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांत संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन, शाळा–महाविद्यालयांत संविधान विषयक व्याख्याने,चर्चासत्रे,निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन, जिल्हा व तालुकास्तरावर संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन,ग्रामीण व शहरी भागांत संविधान मूल्यांवरील कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरे,युवकांमध्ये संविधानप्रेम वाढविण्यासाठी विशेष सामाजिक व शैक्षणिक अभियान “संविधान ही केवळ एक ग्रंथरचना नसून भारतीय लोकशाहीची आत्मा आहे.राज्यातील प्रत्येक घटकापर्यंत संविधानिक मूल्यांची पोहोच व्हावी आणि अमृत महोत्सव हा जनतेचा महोत्सव व्हावा,” असा ठाम आग्रह संस्थेने व्यक्त केला. सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन तत्काळ कळवावे, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला, उपाध्यक्ष इम्रान काझी,कार्यकर्ते समीर सय्यद,अक्षय सातव, विशाल फल्ले,शफिक शेख,मुन्ना तांबोळी,बबलू शेख,आकाश पवार,मोसिन मुल्ला,अलीम दारूवाले,आकाश किरवे आदी उपस्थित होते.
“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रमाणेच संविधान अमृत महोत्सव हा सामाजिक जागृतीचा मोठा उत्सव व्हावा. युवा पिढीत संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे.”
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार