- कळंब (माधवसिंग राजपूत ) – जो विद्यार्थी अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतात.प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे ज्यांनी ध्येय, दृष्टिकोन,ध्येयाकडे वाटचाल करण्याचे निश्चित केले तो जीवनात यशस्वी होतो.आज परिस्थिती बदलली आहे आर्थिक कुवतीप्रमाणे शिक्षण घेता येत आहे,यासाठी संघर्ष विद्यार्थी व पालकांना करावा लागत आहे. पालकांनी खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे असे विचार प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक गणेश लोमटे यांनी कळंब येथे किसनलाल जाजू,व गोविंद जाजू स्मृती समारोह समिती आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम प्रसंगी करिअर मार्गदर्शक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे या होत्या. मंचावर गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते,शिक्षण विस्तार अधिकारी संतोष माळी,शिक्षण विस्तार अधिकारी धाराशिव भारत देवगुडे,प्राचार्य पांडुरंग भवर, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे ,किसनलाल जाजू व गोविंद जाजू ,समारोह समितीचे प्रवर्तक श्रीनिवास जाजू यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना गणेश लोमटे यांनी विद्यार्थी ,शिक्षक व पालक यांनी
आपले दायित्व पूर्ण केल्यास देश लवकर महासत्ता बनेल असे सांगून,प्राप्त परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी सूक्ष्म चिंतन करण्याची जबाबदारी पालकांची आहे असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराशिव जिल्हा शिक्षण अधिकारी सुधा साळुंखे यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी उत्तर प्रदेश तामिळनाडू या राज्यापेक्षा कमी असतात याकडे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवली पाहिजे जीवनाची दिशा निश्चित केली पाहिजे गुणवंत यामध्ये सर्व गुण संपन्न चतुर,चालाख असा विद्यार्थी असावा ध्येयाने वेडे व्हावे लागते तरच ध्येयार्यंत पोहोचू शकतो असे विचार व्यक्त करून त्यांनी स्वतःअधिकारी बनवण्याचे ठरविले व यासाठी जिद्द व चिकाटी याच्या माध्यमातून अधिकारी वर्ग १ जिल्हा शिक्षणाधिकारी अधिकारी म्हणून काम करीत आहे असे सांगितले.या कार्यक्रमात इयत्ता दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या दोन विद्यार्थ्यांना रोख राशी विभागून १०,००० रुपये व पाच विद्यार्थ्यांना स्वर्गीय किसनलाल जाजू व गोविंद जाजू ट्रॉफी, पेन, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र तसेच तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र,पेन,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय किसनलाल राजू व गोविंद जाजू यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाचे प्रवर्तक श्रीनिवास जाजू ,जगदीश जाजू, महेश जाजू, आयुष जाजू, सौ. सरिता जाजू,यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश जाजू,सूत्रसंचालन काकासाहेब मुंडे यांनी तर आभार माधवसिंग राजपूत यांनी मानले.कार्यक्रमात सहशिक्षिका प्रतिभा गांगुर्डे यांनी त्यांची आई रंभाबाई गांगुर्डे यांच्या स्मरणार्थ सावित्रीबाई फुले विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला तर कोचिंग क्लासेसचे बनेश्वर शिंदे व बळीराम कवडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल जाजू परिवारातील सदस्यांचा सत्कार केला.याप्रसंगी बनेश्वर शिंदे यांच्या एन एम एम इयत्ता आठवी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उन्मेश पाटील,डॉ. गिरीष कुलकर्णी,सुरेश टेकाळे, काकासाहेब मुंडे,अशोक शिंपले ,विक्रम गायकवाड, माधवसिंग राजपूत, विक्रम मायाचारी,सोपान पवार,शंकर गोंदकर,शरद खंदारे,सोमनाथ सावंत,ज्ञानेश्वर तोडकर,परमेश्वर मोरे ,प्रशांत पडवळ, बालाप्रसाद मुंदडा,सचिन. क्षिरसागर यांनी परिश्रम घेतले . -
१०० टक्के गुण मिळालेल्या खालील दोन विद्यार्थ्यांना १०,००० हजार रुपये विभागून देण्यात आले.१. गोसावी असावरी अशोक. १००%,
२.अडसूळ कृष्णा विलास. १०० %
या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी ,प्रशस्तीपत्र पेन ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
१.शेळके ओम अनिल. ९९.८० %
२. पांगळ मोहित संतोष ९९.४०
३.शेळके अक्षरा अनिल ९९.४०. ४.इखे आशुतोष अशोक. ९९.४०. - खालील पाच आर्थिक दृष्ट्या
- कमकुवत घटकातील ५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५००० हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात आले
१.वाळके तन्वी महादेव ,विद्याभवन हायस्कूल कळंब - २कु. वैद्य पूनम सतीश
जि.प. प्रशाला खामसवाडी
३. वैष्णवी चांदणे
छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा - ४.प्रथमेश प्रशांत उपाडे
सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब५. स्नेहल धनंजय टोपे.
धरणग्रस्त माध्यमिक विद्यालयात लोहटा पूर्व
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वेद शैक्षणिक संकुलात वृक्षारोपण