June 20, 2025

‘सा.साक्षी पावनज्योत’ मधून महापुरुषांच्या विचारांची पेरणी – माधवसिंग राजपूत

  • कळंब (महेश फाटक ) – साक्षी पावनज्योत या साप्ताहिकाच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांची पेरणी समाजात सातत्याने केली जात आहे.हे कार्य समाजप्रबोधनासाठी अत्यंत आवश्यक असून,अशा प्रयत्नांतूनच नवभारताच्या निर्मितीस चालना मिळू शकते.असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा उपसंपादक माधवसिंग राजपूत केले.
    बहुजनांच्या न्याय हक्कासाठी शहरातून प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योतच्या “बुद्ध जयंती विशेषांकाचे ” प्रकाशन सोहळा दि.१२ मे २०२५ वार सोमवारी रोजी सकाळी ९.३० वाजता उत्साहात संपन्न झाले.

  • या प्रकाशन सोहळ्यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात या विशेषांकात तथागत गौतम बुद्धाच्या धम्मविचारांपासून ते महामानवांच्या सामाजिक क्रांतीपर विचारांपर्यंतचा लेखांतून व्यापक पट मांडण्यात आला आहे.असे सांगून संपादक सुभाष घोडके यांनी विशेषांकाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
    राजपूत यांनी पुढे सांगितले की, महापुरुषांचे विचार हे केवळ वाचनापुरते मर्यादित न राहता,ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची गरज आहे. ‘साक्षी पावनज्योत’ हे साप्ताहिक हेच कार्य अत्यंत समर्पकतेने करीत आहे.
    याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज अडसूळ,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,पिंपळगाव (डोळा) येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र रणदिवे,गृहरक्षक दलाचे संजय कदम,श्रीमती शेंडगे,विजय ओव्हाळ, शौर्य रणदिवे आदींची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी संपादक प्रा. अविनाश घोडके यांनी केले.

error: Content is protected !!