धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात जल व भूमी व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘ अन्न सुरक्षिततेसाठी शाश्वत जल नियोजन’ विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन सोमवार, दिनांक 10 मार्च 2025 व मंगळवार,दिनांक 11 मार्च 2025 रोजी करण्यात आले आहे. सकाळी 9:00 ते 10 या वेळेत प्रतिनिधी नोंदणी होणार आहे. सकाळी 10 ते 12 या वेळेत विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांचे अध्यक्षीतेखाली उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.परिषद निमंत्रक व जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डाॅ. नितीन पाटील परिषदेचे प्रास्ताविक भाषण करतील.11:15 ते 11:45 या वेळेत प्रमुख अतिथी डाॅ. बाबासाहेब ठोंबरे,नेताजीराव गोरे यांचे उद्घाटनपर व्याख्याने होणार आहेत.11:45 वाजता विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ. प्रशांत दिक्षित यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.सुप्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे ” अन्न सुरक्षिततेसाठी शाश्वत जल नियोजन” या विषयावर 12 वाजता मुख्य भाषण होणार आहे. दुपारच्या तांत्रिक सत्रात 1 वाजता प्रा.रमेश पांडव ‘ इस्राईल देशातील शाश्वत जल नियोजन’ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 3 वाजता, आयसीएआर,येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ,डाॅ.लालासाहेब तांबडे, ‘भविष्यातील शेतीत पाण्याचा कार्यक्षम उपयोग’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. 4:30 वाजता प्रतिनिधी संशोधन लेख सादर करतील. मंगळवार,दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता, प्रतिनिधी विविध विषयावर संशोधन लेख सादर करतील.सकाळी 11वाजता, तिसऱ्या तांत्रिक सत्रात नेटाफिम इरिगेशनचे डाॅ. अरुण देशमुख ‘ अन्न सुरक्षिततेसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी 12 वाजता,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील प्रा.किरण जाधव ‘ संवर्धन शेती : शाश्वत कृषी पद्धतीचा मार्ग ‘ या विषयावर 12 वाजताञ व्याख्यान देणार आहेत. सीएसएन, इंजिनिअर, विकास पाटील ‘जल पुनर्भरण’ या विषयावर 1 वाजता मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभाचे आयोजन दुपारी 1:15 वाजता करण्यात आले आहे. एसएओ, धाराशिव रविंद्र माने, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. अंकुश कदम, डाॅ. आर. टी. बेद्रे, संचालक, मानव संसाधन विकास केंद्र, सागर, मध्य प्रदेश, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संशोधक, प्राध्यापक, व्यावसायिक, विद्यार्थी, सुजाण नागरिक यांनी परिषदेस उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजन सचिव, अभिजीत पडवळ, निमंत्रक तथा जल आणि भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डाॅ. नितीन पाटील, उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांनी केले आहे.
More Stories
अतिश वाघमारे यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
संकल्प ते सिद्धी’ अंतर्गत धाराशिव भाजपचा जनता दरबार