June 21, 2025

रोजगार मेळाव्यात ३९४ उमेदवारांनी दिल्या मुलाखती त्यापैकी ९८ उमेदवारांची प्राथमिक निवड

  • कळंब – दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, धाराशिव व साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन,रांजणी यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास 394 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.या मेळाव्याचे उद्घाटन नॅचरल उद्योग समूहाचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त संजय गुरव, कृषीभूषण पांडुरंग आवाड, श्री साई सर्वांगीण विकास प्रतिष्ठानचे सचिव ए.बी.ठोंबरे,कौशल्य विकास अधिकारी श्रीहरी साळुंखे,उद्योग निरीक्षक अभिजीत लांडे,लोकमंगल उद्योग समूहाचे सतीश देशमुख,डॉ. सर्जेराव साळुंखे,प्राचार्य जे.सी. गवळी आदींची उपस्थिती होती. या मेळाव्यात 12 आस्थापनासाठी 394 उमेदवारांनी मुलाखती दिल्या.यात पुरुष 254 तर महिलाची संख्या 140 होती. यातील 98 लोकांना प्राथमिक निवडी देण्यात आल्या.
    हा रोजगार मेळावा स्थानिक युवकांसाठी एक महत्त्वाची संधी ठरला,ज्यामुळे अनेकांना रोजगार मिळवण्यास मदत झाली.यावेळी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास, उद्योजकता विभागाचे सर्व कर्मचारी,साई कॉलेज चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!