धाराशिव (जिमाका) – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ३७ हजार ५२१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४७ कोटी ५० लक्ष रुपये जमा करण्यात आले आहे.ही योजना १ फेब्रुवारी २०१९ पासून शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी सुरू करण्यात आली असून,शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये (दर चार महिन्यांनी २ हजार रुपये) थेट बँक खात्यात (DBT) मिळतात. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहारमधील भागलपूर येथून पंतप्रधानांच्या हस्ते १९ व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे जिल्हास्तरीय थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी खंडेराव सराफ,कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक सचिन सूर्यवंशी,उपविभागीय कृषि अधिकारी महादेव आसलकर, तालुका कृषि अधिकारी श्री.एस.पी. जाधव (धाराशिव),महेश देवकते (तुळजापूर) व कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. आधार लिंक,ई-केवायसी व लँड सिडिंग प्रक्रिया पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनाच हप्ता मिळाला आहे. अजूनही काही शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण नसल्यास त्यांनी लवकरात लवकर तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि सहाय्यकांशी संपर्क साधावा. पीएम किसान योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन पेरणी खर्च, नापिकी,कीड-प्रदुर्भाव यांसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी या योजनेचा नियमित लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत अद्ययावत करावीत,असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
More Stories
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी