कळंब – संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची कर्मभूमी असणाऱ्या पावन भुमी विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,पुढील काळात हे तिर्थ क्षेत्र नावारूपाला आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केले आहे.
कळंब शहरातील संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरास तिर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. व डिपीडिसी मधुन तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यातील एक कोटीचा निधी करण्यात आला आहे. सभागृहाचे भूमीपूजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.यावेळी व्यासपीठावर लिंगायत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र (आबा) मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी कापसे,माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा,माजी जिल्हा परिषद सदस्य संदिप मडके, शिवसेना संपर्कप्रमुख नितीन लांडगे,अविनाश खापे, नितीन पाटील,सागर मुंडे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत म्हणाले की,शहरातील संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची कर्मभूमी अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित होती. आणि या पावन भुमीला पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणि याचे भुमी पुजन करण्याचे मला भाग्य लाभले आहे. सध्या डिपीडिसी मधून एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला व उर्वरीत दोन निधी मिळणार आहे. तसेच हे तिर्थ क्षेत्र नावारूपाला आणण्यासाठी आमचा कायम प्रयत्न असणार आहे. शहरातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हे तिर्थ क्षेत्र नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केले आहे. यावेळी प्रस्तावित निलेश होनराव यांनी केले आहे. तर आभार अविनाश खरडकर यांनी केले आहे. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
* संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीला निधी देऊ, तिर्थ क्षेत्र नावारूपाला आणू असे फक्त आश्वासने दिली गेली आहेत. मात्र पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी शब्द देऊन तीन कोटींचा निधी मंजूर व यातील एक कोटीचा निधी उपलब्ध करून देऊन शब्द पाळला आहे.असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी केला आहे.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे