June 22, 2025

संविधानाच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीला सत्ता द्या – खा.राहुल गांधी

  • कोल्हापूर – गरिबांना फक्त स्वप्न दाखवून शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रात खाजगीकरण करून डोनेशनच्या माध्यमातून आर्थिक लूट सुरू आहे.पारंपरिक कलावंतांचा इतिहास पुसला जात असून एस.सी,एस.टी, ओबीसी,अल्पसंख्यांकाचे सर्वच क्षेत्रातील रस्ते बंद करण्यात आले आहेत.अग्निविर ही योजना राबवून सैनिकांची पेन्शन बंद केली आहे.संविधान डोक्याला लावले जाते मात्र संविधानिक मुल्यांचा काडीमोल करण्याचा सपाटा मोदी सरकारने केला असल्याचा घणघणाती आरोप करून देशातील ९५% लोकांचे मूलभूत अधिकार आणि सर्वच क्षेत्रात भागीदारी करण्यासाठी, सामाजिक,आर्थिक स्तरावर जाती गणना करण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र जोपासून संविधानाच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीला सत्ता द्या असे भावनिक आवाहन विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांनी कोल्हापूर येथील संविधान सन्मान संमेलनातील सहभागी कार्यकर्त्यांना व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण प्रसंगी शिवप्रेमींना केले.
    भारताचा सर्वोच्च कायदा आणि लोकशाहीचा रक्षक आपली राज्यघटना आहे. महिला,दलित, आदिवासी,इतर मागासवर्गीय, धार्मिक,अल्पसंख्यांक,उच्चवर्णीय गरीब आणि बहुजन गरीब, प्रत्येक दुर्बल आणि मागासलेल्या भारतीयांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी शहाजी हॉटेलच्या भव्यदिव्य अशा खुल्या वातानुकुलीत हॉलमध्ये संविधान सन्मान समेलनाच्या पहिल्या सत्रात राजेंद्रपाल गोतम यांच्या अध्यक्षतेखाली वारकरी परंपरा आणि भारतीय संविधान या विषयावर ज्ञानेश्वर बंडगर, सुभाष वारे,श्रीरंग गायकवाड,सचिन पवार,यश अंबाळे ,हासिफ नदाफ यांनी आपले विचार मांडले. नफरत के बाजार में मोहम्मद की दुकान या विषयावर अशोक भारती यांच्या अध्यक्षतेखाली प्रज्ञा दया पवार,मीनाज सय्यद, सायमन मार्टिन, तिसता सेटलवाढ, प्रा.डी.यू.पवार, विशाल पिंजानी यांनी आपले विचार मांडले.
    प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महिला व संविधानातील मूल्य या विषयावर हसीना शेख, मोनाली चंद्रशेखर अपर्णा,मेघा पानसरे, पल्लवी रेणके,कुसुम आलाम यांनी आपले विचार मांडले.
    डॉ. अनिल जयहिंद यांच्या अध्यक्षतेखालीय राजश्री छत्रपती शाहू महाराज सामाजिक क्रांतीची अग्रदूत या विषयावर भारत पाटणकर,उल्का महाजन, प्रा. टी.एस.पाटील, मंजुश्री पवार यांनी आपले विचार मांडले तर सुभाषिनी यादव यांच्या अध्यक्षतेखाली जातवार जनगणना या विषयावर नितीन चौधरी,डॉ.राजेंद्र कुंभार,शबीर अंसारी,धनंजय विभूते यांनी विचार मांडले.
    दुसऱ्या सत्रामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार,हक्क आणि कर्तव्य तसेच भाजपा सरकार कशा पद्धतीने संविधानिक मूल्यांचा ऱ्हास करत संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे ते सविस्तर सांगून या संमेलनाचे समारोप भाषण केले. या संमेलनासाठी सामाजिक संस्था व संघटनांचे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. संम्मेलन यशस्वी करण्यासाठी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सौजन्यातून प्रतिभा शिंदे,सुभाषिनी यादव,डॉ.अनिल जयहिंद,अशोक भारती, आ. राजेंद्र पाल गौतम आणि त्यांच्या टीमने अहोरात्र परिश्रम घेतले.
    या संमेलनाची सुरुवात संविधानातील उद्देशिकेचे
    सामूहिक वाचन करून झाली तर राष्ट्रगीतानी समारोप करण्यात आला.
  • सम्मेलनाचे आकर्षण –
  • ** हॉटेल सयाजीच्या बाजूस दोन हजार कार्यकर्ते बसतील अशी व्हीआयपी बैठक व्यवस्था
  • ** ओपन हॉल असून सुद्धा वातानुकुलीत व विद्दुत रोषणाई सह जबरदस्त साऊंड सिस्टीम
  • ** डिजिटल विद्दुत रोषणाई सह सर्व संत महात्मे व महापुरुषांची तेलचित्रे असलेला स्टेज
  • ** मुख्य गेट पासून हॉलपर्यंत सर्व संतांचे अभंगासह कट आउट व महापुरुषांचे कट आऊट, हॉलमध्येच नाष्टा,चहा, जेवणाची उत्तम व दर्जेदार अशी व्यवस्था
  • ** कार्यकर्त्यांना लॉजिंग व बोर्डिंगची उत्तम व्यवस्था
  • ** कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेसाठी २०० स्वयंसेवक तैनात, प्रत्येक कार्यकर्त्याना वैयक्तिक फोनवर विचारपूस.
error: Content is protected !!