June 23, 2025

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने गुणिजनांचा सत्कार

  • कळंब – गुणिजनांच्या सत्काराचे आयोजन राष्ट्रीय ओबीसी महासंघ धाराशिव च्या वतीने पर्याय सामाजिक संस्था कळंब या ठिकाणी करण्यात आले होते .
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, कळंब तालुक्यातील पर्याय सामाजिक संस्थेत राष्ट्रीय ओबीसी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त सुखदेव भालेकर आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घालणारे किरण डाके यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. अनिक फायनान्स लिमिटेडचे चेअरमन आणि पर्याय सामाजिक संस्थेचे संस्थापक, वंचित ,पीडित ,कष्टकरी, एकल महिला ,भटक्या विमुक्त ,आदिवासी,आणि दिन दलितांचे कैवारी विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ओबीसी संघर्ष योद्धा संतोष वीरकर यांचाही सन्मान करण्यात आला.
    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पदाधिकारी म्हणून काम करत असतानाच शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षण यावर अधिक लक्ष केंद्रित करत शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांप्रती आणि समाजाप्रती बांधिलकी जोपासत काम केले असल्याचे यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय सुखदेवजी भालेकर यांनी यावेळी सांगितले तर शिक्षकी पेशात कार्यरत असूनही आपल्यातील अधिकारी बनण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. अधिकाऱ्यांचे गाव असलेल्या उपळाई बुद्रुक या गावात काम करत असल्यामुळे तेथील प्रेरणा घेऊनच मी गेली दहा वर्ष सातत्याने या यशासाठी प्रयत्न करत अखेर हे यश मिळवले असे यावेळी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घालणाऱ्या श्री किरण डाके यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. अंतरवाली सराटी येथे सतत नऊ दिवस उपोषण करणारे संघर्ष योद्धा श्री संतोष वीरकर यांनीही उपोषणादरम्यान घडलेल्या विविध घटनांचा आढावा यावेळी उपस्थित त्यांना सांगितला. काळ कठीण आहे. समाजा समाजात दरी निर्माण होत आहे. यावेळी आपण आपल्या अधिकारापासून हक्कापासून दूर जात आहोत. यावेळी सजग आणि जागृत राहून आपण आपले हक्क अबाधित ठेवले पाहिजेत.आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी हा संघर्ष आपल्याला करणे भाग आहे. संविधानाचे रक्षण करून झुंडशाहीला थोपवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे यावेळी संतोष वीरकर यांनी सांगितले. तर सन्माननीय विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की ही लढाई जाती जातीची नाहीच. तर ती विस्थापित आणि प्रस्थापितांची लढाई आहे. प्रत्येक समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत ही दरी कायम आहे. उपेक्षित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्यासारख्या सर्व सुशिक्षितांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अण्णांनी यावेळी केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांनी तर आभार प्रदर्शन मराठवाडा अध्यक्ष पैलवान दीपक जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ज्योतीराम बप्पा कोरे, संतोष चौगुले ,सरचिटणीस सतीश वैद्य यांच्यासह तालुकाध्यक्ष शंकर कराड सावता माळी जि प सदस्य तानाजी माळी यांनी प्रयत्न केले.
    कार्यक्रमास लातूरहून विजयकुमार पिनाटे ,लक्ष्मण दावनकर ,हिरालाल पाटील ,भारत काळे तर धाराशिव जिल्ह्यातील बालाजी माळी ,अशोक खडके, राजेंद्र लोहार, सिद्धेश्वर कुंभार, ज्ञानेश्वर घोडके ,नामदेव वाघमारे ,सुहास दराडे, डॉक्टर राहुल झेडगे ,रंगनाथ दुधाळ, प्रदीप माळी ,सचिन भांडे, दिलीप मेहेत्रे ,सावता माळी ,भास्कर कांबळे ,पांडुरंग लोकरे, सचिन डोरले, गोपाळ माळी ,महादेव गाढवे ,अतुल लोहार, खंडू घुले ,अशोक चिंचकर, सावता माळी पळसप ,भुजंग लोकरे, दादासाहेब कोळी यांच्यासह ओबीसी समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!