कळंब – भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रविवार दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी समता नगर कळंब येथे महिला शाखेचे उद्घाटन करून वर्षावासानिमित्त तथागत बौद्ध विहार कळंब येथे प्रवचन करण्यात आले. संस्थेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मण धावारे यांनी आजचा विद्यार्थी, पालक,माता, नेते आणि नोकरदार यांच्या समाजाप्रती काय भूमिका आहेत? याविषयी मार्गदर्शनपर प्रवचन केले. आजचा विद्यार्थी हा मोबाईलच्या 1.5 जीबी डाटामध्ये गुंतून पडले आहेत. किमान रात्री बारा वाजेपर्यंत तो कुटुंबापासून विभक्त असून पालक व्यसनाच्या अधीन झालेले आहेत. समाजातील राजकीय नेते शेळी झालेले असून लांडग्याच्या कळपात शिरले आहेत त्यामुळे समाजाचा विकास शक्य नाही तर नोकरदार हा गाडी, माडी, साडी आणि ताडी या दुष्टचक्रात अडकलेला आहे.तेव्हा या कठीण काळात कुटुंबाची सर्व जबाबदारी महिलांवर येऊन पडली आहे. तिलाच कुटुंबाची आई आणि वडील ही दुहेरी भूमिका बजावावी लागत आहे.विहार, समाजमंदिरे, चर्च आणि शाळा ही समाजाची संस्कार केंद्रे आहेत ही भूमिका ठेवून सामाजिक जाण असलेल्या काही शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी विहारास दहा हजार रुपयाची पुस्तके भेट दिली आहेत.तसेच निलावती विठ्ठलराव समुद्रे व जलीता वाघमारे या दोन महिलांनी विहारास रुपये 15000 चे लोखंडी कपाट पुस्तकासाठी दान दिले आहे. महिला शाखेचे उद्घाटन,कपाटाचे व पुस्तकांचे लोकार्पण आणि वर्षावासाचे प्रवचन असा त्रिवेणी संगम आजच्या उद्घाटन सोहळ्यात दिसून आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट दिलीप निकाळजे ओबीसी महासंघाचे मुख्याध्यापक संतोष भोजने,यांनी महापुरुषांनी समाजाप्रती केलेल्या त्यागाचीसर्वांनी जाणीव ठेवावी या आशयाचे मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी शाखेचे अध्यक्ष भाग्यश्री टोपे,सचिव ऋतुजा जगताप, कोषाध्यक्ष सुशीला गजधने, यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष हनुमंत प्रतापे,कोषाध्यक्ष ऍडव्होकेट किशोर पायाळ, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त कॅशियर अरुण लोंढे,महादेव टोपे वंचितचे अनिल हजारे, गोविंदपुर चे सरपंच अशोक मस्के, व तालुक्यातील सर्व ग्रामशाखांचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती धावारे, सुकेशनी सावंत,ज्योती टोपे, आम्रपाली गाडी,वैशाली धावारे,आशा धावारे,पूजा हौसलमल,शिला घाडगे, आशा हजारे,शांताबाई टोपे,मंगल धावारे, जयश्री वाघमारे, नीलिमा शीलवंत, लक्ष्मीबाई गरड,शोभा साखरे,तारामती कसबे, गयाबाई कांबळे,जयश्री(नानी)गाडे, लीलावती डोंगरे,विमलताई सोनवणे, लताबाई आव्हाड, नागरबाई वाघमारे, छाया कांबळे, लक्ष्मी वाघमारे, छाया धावारे, नलिनी आव्हाड, लक्ष्मी जाधव,मंगल गवळी, उर्मिला वाघमारे, आशा सावंत, भागीरथी वाघमारे, करुणा जगताप, गौतमी सुकाळे, उषा शिनगारे, व समस्त महिला उपस्थित होत्या.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा