धाराशिव (जिमाका) – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांनी त्वरित आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांनी केले आहे. राज्य शासनाची महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९ अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु आहे.जिल्हयात अखेर ४८ हजार ५०० लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द झाल्या आहेत.योजनेचा लाभ मिळणेकरीता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. आजअखेर ४५ हजार ९८४ शेतकरी लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले असून,त्यापैकी ४४ हजार ६६४ शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर १३० कोटी ५८ लाख रुपये रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे.अजुनही २ हजार ५०८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेल नाही.उर्वरीत आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी महा-आयटी यांनी दि.१२ ऑगस्ट ते दि. ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी