धाराशिव (जिमाका)- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुर्नरीक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आला होता.यानुसार 2 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी सर्व मतदान केंद्र, तहसिल कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे.
मतदार यादीवर आता दावे हरकती स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. 16 ऑगस्टपर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत.यामध्ये नागरिकांकडून मतदार नोंदणीचे, मतदार यादीमधील दुरुस्ती तसेच नाव वगळणीचे अर्ज मागविण्यात येत आहेत.याच कालावधीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार या दिवशी विशेष मोहिमांचा कालावधी असणार आहे.
26 ऑगस्ट रोजी दावे, हरकती निकालात काढणे,अंतिम प्रसिध्दीस आयोगाची परवानगी घेणे,डाटाबेस अद्यायवत करणे आदी कार्यक्रम असणार आहे.यानंतर 27 ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.नागरिकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावे.त्याबरोबरचे मतदार यादीत नाव असल्याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंम्बांसे यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी