कळंब – नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात पारित केलेल्या जनसुरक्षा विधेयकास भारत जोडो अभियानाचा राज्य स्तरावरून विरोध करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कळंब तहसिलदार मुस्तफा खोंदे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना भारत जोडो अभियानाच्या धाराशिव जिल्हा शाखेमार्फत दिनांक १८ जुलै २०२४ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,हा कायदा सरकारी दडपशाहीला वाव देणारा, असंविधानिक आणि शासन व पोलीसी मनमानीला वाव देणारा आहे. सरकारला जाब विचारणारे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी व नागरिक संघटनाच्या विरोधात व त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी हा कायदा वापरला जाणार आहे. सरकारवर अंकुश ठेवणे, सरकारला जाब विचारणे हा लोकशाहीमध्ये नागरिकांना संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण जाब विचारल्याबद्दल किंवा शासकीय धोरणांची चिकित्सा व पोलखोल केल्याबद्दल त्यांच्यावर सुडभावनेने कारवाई करण्याचे काम गेल्या दहा वर्षात भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात केले आहे.केंद्र सरकारचा UAPA व नुकतेच पारित केलेले फौजदारी सुधारणा कायदे असताना महाराष्ट्र सरकारने पुन्हा जनसुरक्षा विधेयक आणने म्हणजे दडपशाही लादण्याचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्याचा हेतू स्पष्ट होत आहे. या निवेदनावर धाराशिव जिल्हा समन्वयक सुभाष घोडके, शहराध्यक्ष माधवसिंग राजपूत, भारतीय परिवर्तन बहुजन सेना जिल्हाध्यक्ष नवनाथ भंडारे,काँग्रेसच्या सौ.ज्योतीताई सपाटे,कर्मचारी अधिकारी महासंघ तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड,माजी मुख्याध्यापक सी.आर.घाडगे,लोक जनशक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष भारत कदम, रामेश्वर खापे,परमेश्वर खडबडे,विक्रम भंडारे,संजय गायकवाड,बाबुराव डिकले,प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रा.अविनाश घोडके,युवा सेनेचे कार्यकर्ते आयान शेख,सामाजिक कार्यकर्ते प्रेम आल्हाट,श्रेयस उबाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा