कळंब – आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अजित दादा पिंगळे मित्र परिवाराच्या वतीने दि.१७ जुलै २०२४ रोजी फराळाची सोय करण्यात आली आहे. साधारण आठ हजार वारकऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या – दर्शनासाठी अनेक वारकरी पावन पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे भक्तीचा मळा – फुलला आहे. कळंब शहरातुन – पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची – संख्या लक्षणीय आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी बस व इतर वाहनाने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना खिचडीची सोय व्हावी, या करीता अजितदादा पिंगळे मित्र परिवारांच्या वतीने शहरातील बस स्थानकावर सकाळपासून खिचडी, दही व केळीची सोय करण्यात आली होती. साधारण चार क्विंटल शाबुदाण्याची खिचडी आचारी घनश्याम यांनी बनवुन दिली. भाजप तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी वारकऱ्यांकरिता अन्नदानाची सोय केली होती. यावेळी भाजपाचे नेते नितीनजी काळे, कळंब पोलीस निरीक्षक सानप,अरुण चौधरी,माणिक बोंदर,युवराज पिंगळे,रोहित कोमटवार,अनंत वाघमारे,युवराज धाकतोडे, विकास कदम,शितल चोंदे, इम्रान मुल्ला,शिवा शिंगणापुरे, रोहित मुंडे,सतपाल बनसोडे,किशोर वाघमारे,सुनील गायकवाड,संदीप बाविकर,प्रशांत लोमटे,गोपाळ चोंदे, प्रवीण कापसे,रवींद्र जाधव ,लखन गायकवाड, अब्दुल मुलानी,बिबीशन काळे, राहुल चव्हाण, नारायण टेकाळे,सागर शिंदे, रोहन पांगे,अण्णा पिंगळे,यशवंत जाधव,धनंजय दळवी,ज्योतिबा नवले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा