धाराशिव (जिमाका) – महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्यासह पोषणात सुधारणा करण्यासोबतच कुटुंबातील त्यांच्या निर्णयक भूमिकेच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. जिल्ह्यातील 4 लक्ष 48 हजार 636 महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.यामध्ये शहरी भागातील 79 हजार 304 आणि ग्रामीण भागातील 3 लक्ष 69 हजार 332 महिलांना लाभ देण्याचे नियोजन आहे.2 जुलै ते 15 जुलैपर्यंत 99 हजार 665 महिलांचे अर्ज प्राप्त झाले.यामध्ये 12 हजार 215 शहरी आणि 87 हजार 450 ग्रामीण महिलांच्या अर्जाचा समावेश आहे.त्यापैकी 79 हजार 445 महिलांचे अर्ज या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले.यामध्ये शहरी भागातील 10 हजार 387 आणि ग्रामीण भागातील 69 हजार 58 महिलांच्या अर्जाचा समावेश आहे. 2 जुलै ते 15 जुलैपर्यंत 99 हजार 665 महिलांचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये धाराशिव शहरातील 2064 आणि ग्रामीण भागातील 12 हजार 186, तुळजापूर तालुक्यातील शहरी भागातील 2059 आणि ग्रामीण भागातील 9799,उमरगा तालुक्यातील उमरगा व मुरूम शहरी भागातील 2021 आणि ग्रामीण भागातील 15 हजार 768,लोहारा शहरातील 466 आणि ग्रामीण भागातील 6112,भूम शहरातील 480 आणि ग्रामीण भागातील 4012,परंडा शहरातील 1471 आणि ग्रामीण भागातील 10 हजार 544, कळंब शहरातील 1296 आणि ग्रामीण भागातील 3205, वाशी शहरातील 530 आणि ग्रामीण भागातील 7 हजार 432 असे शहरी भागातील 10 हजार 387 आणि ग्रामीण भागातील 69 हजार 58 असे एकूण 79 हजार 445 अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहे. आतापर्यंत शहरी भागातून 15.40 टक्के तर ग्रामीण भागातून 23.68 टक्के अर्ज प्राप्त झाले आहे. जास्तीत जास्त महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी