कळंब – येथील अत्यंत कमी कालावधीत अनेक तरुण तरुणी यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचविण्याचे कार्य साईलक्ष करियर अँकॅडमी करत आहे. तालुक्यात स्पर्धा परीक्षेत उतरण्याची इच्छा असूनही काही ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना सोयी अभावी उतरता येत नाही. त्यामुळे मागील काही वर्षाअगोदर बोटावर मोजण्याइतके आपल्या भागातून सरकारी नोकरीत भरती होत असत. परंतु आता शहरात सर्व सोयीसुविधायुक्त अभ्यासिका झाल्यामुळे मुलांना आपले घर सोडून दूर पुणेसारख्या शहरात जाऊन राहण्याची आवश्यकता राहिली नाही. मनावर कोणतेही दडपण न ठेवता अत्यंत मोकळ्या वातावरणात अभ्यास करण्याची सोय कळंब शहरात झाली असल्याचे विध्यार्थ्यातून बोलले जात आहे. साईलक्ष करियर अँकॅडमी मधून मंत्रालयातील कक्ष अधिकारी, पीएसआय,शिक्षक,पोलीस, तलाठी,रेल्वे आरपीएफ, कोतवाल अशा सर्व पदावर विद्यार्थ्यांनी गवसणी घातली आहे. प्रत्येक निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अकॅडमीच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाते. साई लक्ष करियर अँकॅडमीचे मार्गदर्शन लाभलेले कु. सविता जगताप यांची छत्रपती संभाजीनगर आणि राम शेवाळे यांची धाराशिव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून निवड नुकत्याच लागलेल्या यादीतून झालेली आहे. त्याबद्दल साईलक्ष करियर अँकॅडमीचे संचालक हनुमंत पुरी यांनी मान्यवरांच्या हस्ते दोघांचाही यथोचित सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा