June 24, 2025

भारत जोडो अभियान ची महाराष्ट्र स्तरावरील बैठक संपन्न

वर्धा (प्रत्युष बाबा ) – लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यात मिळवलेलं मर्यादित यश असले तरी पण आता विधानसभा निवडणुकीत दगाबाजी व बेकायदेशीररित्या लादलेलं भाजपा च सरकार घालवून महाविकास आघाडीला संपूर्ण यश मिळवण्याचा बैठकीत निर्धार करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १२५ च्या वर जागांवर महाविकास- आघाडीला सहकार्य करणार असल्याचा ठराव भारत जोडो अभियानाच्या राज्य बैठकीत करण्यात आला.
भारत जोडो अभियानाच्या स्वाभिमानी,समृद्ध,समतावादी व सहिष्णू महाराष्ट्र निर्मितीसीठी भारत जोड़ो अभियान ची कटिबद्धता ही दि.९ ते १५ ॲागस्ट २०२४ दरम्यान राज्यभर नफरत छोडो – भारत जोडो अभियान ९ ॲागस्ट २०१४ला मुंबईत ॲागस्ट क्रांती मोर्चा आयोजित केला आहे.
भारत जोडो अभियान पुढील मागण्या घेवून महाराष्ट्रात केंद्र व राज्य सरकार हिसाब करो – जबाब दो म्हणुन अभियान राबवणार आहे.
टॅक्स रुपाने व औद्योगिक उलाढालीत राज्याचा वाटा राज्याला मिळालाच पाहिजे,नवे प्रकल्प परराज्यात न जाऊ देता राज्याचा विकास हवा,भारत जोडो अभियान करणार महाविकास आघाडीचे समर्थन मात्र जनतेच्या जाहीरनाम्याला पाठींबा देण्याची अट,शेतकरी – कामगार व कष्टकऱ्यांचा घसरलेला संयुक्त महाराष्ट्र पुन्हा सावरु या,भाजपाच्या दस्तुरखुद्द अयोध्येतील परभवाने सांप्रदायिक धार बोथट होतेय व राज्यातही दलित आदिवासी ओबिसी व अल्पसंख्यंकांना न्याय हवा.ओबिसी विरुद्ध – मराठा लढाई राज्यासाठी भाजपाचा घातक खेळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बैठकीत अभियानच्या विभागीय समित्या जाहीर विदर्भ समन्वयक – अविनाश काकडे,रुबिना पटेल, प्रशांत ठाकरे,मराठवाडा- सुभाष लोमटे,दत्ता तुमवाड कोकण – मुक्ता श्रीवास्तव, राजन इंदुलकर,पश्चिम महाराष्ट्र – मानव कांबळे, संदीप बर्वे,उत्तर महाराष्ट्र – अविनाश पाटील, जालिंदर अडसुळे.प्रदेश प्रशिक्षण समिती – राजू भिसे, प्रो. नूतन माळवी, निश्चय म्हात्रे,महाराष्ट्र समन्वयक – उल्का महाजन, ललित बाबर, संजय मंगला गोपाल हे असणार आहेत.
वर्धा येथील तीन दिवशीय झालेल्या बैठकीचे सर्व नियोजन हे भारत जोडो अभियानचे विदर्भ समन्वयक अविनाश काकडे यांनी केले.

error: Content is protected !!