कळंब ( मानसी यादव ) – राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळा शनिवारी पासून झाल्या असून, दरवर्षी पहिल्याच दिवशी गणवेश, पुस्तके देण्यात येतात मात्र इतर शैक्षणिक साहित्यासाठी विद्यार्थी व पालक खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. तब्बल दिड महिन्यांच्या सुट्यानंतर शाळांना सुरुवात होत आहेत.विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची आवड आहे,सर्व कांहीं नवीन च… होती. आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी,म्हणून सर्वत्रच प्रवेशोत्सव साजरा केला जातो. शिक्षकांनी गुलाब पुष्प वर्षाव करीत विद्यार्थ्यांचे स्वागत करणे,तसेच विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात येते.
याचीच लगबग पहिल्या दिवशी असते. पहिल्याच दिवशी प्रत्येक शाळेत राज्य शासनाकडून मिळणारी मोफत पाठयपुस्तके पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळतात. परंतु शालेय इतर पोषक असे शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी मागील दोन तीन दिवसांपासून पाल्यांसह पालकांनी शहरातील पुस्तकालय, स्तेशनरी दुकानात पाठ्य पुस्तक व्यतिरिक्त लागणाऱ्या साहित्यासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे.
दरम्यान शिक्षणाधिकारी यांनी नुकत्याच शाळेच्या काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दीर्घ कालावधीच्या नंतर शाळा सुरू होत असलेला वार हा अर्धवेळ असलेला वार असल्याने शाळा सकाळी नऊ ते दुपारी सव्वा एक वाजेपर्यंत घेण्यास सांगितले आहे शिवाय प्रत्येक शाळेने प्रवेशोत्सव घेऊन अहवाल द्यायचं आहे.
@ गतवर्षी पेक्षा यावर्षी स्टेशनरी साहित्य जसे की,पेन,पेन्सिल , कंपास याशिवाय वह्या यामधील किमतीत कांहीही बदल झालेला दिसून नाही. त्यामुळे पालक वर्गामध्ये साहित्य खरेदी बाबत एक समाधान आहे. – जयप्रकाश खिंवसरा (अनमोल पुस्तकालय,कळंब)
More Stories
श्री गुलाब महाराज दिंडीचे हरी नामाच्या गजरामध्ये स्वागत
कळंबमध्ये विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न
विद्याभवन हायस्कूल कळंब येथे जागतिक ऑलिंपिक डे साजरा