वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असूनही मानवी संवेदना जागृत ठेवणे हे सहज शक्य होत नाही. मात्र याला एक अपवाद म्हणजे धनेश्वरी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह भैय्यासाहेब पाटील हे होय. अनेक दिग्गजांना जवळून पाहिलंय, परंतु थोडा यश,थोडा पैसा आला की माणूस जमिनीपासून उचलून हवेत वावरतोआणि लगेच राहणीमान बदलतो अशा वेळी, धनसंपदा व सर्व काही असताना देखील डॉ.भैय्यासाहेब यांचं ठाम, नम्र आणि आपुलकीचं व्यक्तिमत्त्व फार वेगळं ठरतं.त्यांच्या सहवासात आलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते सहकाऱ्यांपर्यंत, नातेवाइकांपासून ते राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाला ते “आपले” वाटतात – हीच त्यांच्या माणुसकीची ओळख आहे. ते पूर्णवेळ राजकारणी नसल्यामुळेच कदाचित त्यांना राजकारणातील चढ-उतार अधिक तीव्रतेने अनुभवावे लागले असतील. पण त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य असं की, विरोधकांबद्दलही मनात ममत्व ठेवत, “सर्वांचं भलं व्हावं” हीच भावना ते जपतात. स्वतंत्र विचार, व्यवहारिक दृष्टिकोन आणि दूरदृष्टी – हे त्यांच्या निर्णयशक्तीमागचं त्रिसूत्र आहे. सुरुवातीला त्यांचे काही निर्णय ‘वेगळे’ वाटले तरी नंतर त्यामागचा विचार समजतो – आणि त्यांच्या निर्णयाची दूरदृष्टी स्पष्ट होते. दाखवावा म्हणून दिखावा, किंवा कर्जबाजारीपणा करून कामं करण्याच्या प्रवृत्तीविरोधात त्यांची स्पष्ट भूमिका नेहमीच दिसून आली आहे.
शैक्षणिक संस्थांमधून ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याचं त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे. निसर्गप्रेम, आरोग्यप्रेम आणि सामाजिक भान ठेवणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विकासाच्या नव्या संकल्पनांवर प्रयोग करणारा, भविष्याची चिंता करणारा, आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारा हा “नेता”पेक्षा अधिक “माणूस” वाटतो – हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकच प्रार्थना…
“आई तुळजाभवानी चरणी साकडं – भैय्यासाहेबांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, आणि समाजकार्याची नित्य नव्याने ऊर्जा लाभो!”
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन