कळंब – नागरिकांनी आपले हक्क,कर्तव्य आणि जबाबदारी यांची जाणीव ठेवून एक चांगला समाज निर्माण होण्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन अनिल यादव यांनी कळंब येथील संत श्रेष्ठ गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आणि विभागाचे मंत्री माननीय मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांना जीवनाची पंच परिवर्तन सूत्री समजून त्याच्यामध्ये आपली नागरी कर्तव्य आणि शिष्टाचार याचे महत्व समजून त्याच्यामध्ये परिवर्तन व्हावे म्हणून संत श्रेष्ठ गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे आज नागरी कर्तव्य आणि शिष्टाचार या विषयावर अनिल यादव यांच्या व्याख्यानाचे आयोजन दिनांक ०६ रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य केशव पवार हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल यादव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य जी.बी.करडे, संस्था व्यवस्थापन समितीचे शासन नवनियुक्त सदस्य महादेव आडसुळ,नवनाथ खोडसे तसेच प्रकाश भडंगे,बंडू ताटे, हरीभाऊ कुंभार,विक्रम भंडारे,पोपट साळवे,दत्तात्रय शेवडे, ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोर्डेकर,पद्माकर माने,श्रीकांत खारके,संतोष बनसोडे हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.यावेळी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी देखील ऑनलाईन प्रणालीद्वारे संदेश दिला व त्यानंतरआय टी आय मधील विविध व्यवसायांवर आधारित कौशल्य गीत दाखविण्यात आले. पुढे बोलताना अनिल यादव यांनी नागरिकांचे हक्क,कर्तव्य, सामाजिक भूमिकेची जाणीव आणि जबाबदारी यांची परिभाषा सांगितली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिल्पनिदेशक अंकुश माळकर तर आभार प्रदर्शन शिल्पनिदेशक वसंत टोपे यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशक शामकांत डोंगे, शिल्पनिदेशक प्रशांत ससाणे, हनुमंत केदार,बालाजी उदबुके ,नितेश पडघान,विश्वनाथ पाटील,तेजस गुटाळ, नदीम शेख, मंचक जाधव, शिल्पनिदेशिका गोदावरी वडजकर, ज्योती शिंदे,कोमल मेंडके,वरिष्ठ लिपिक विलास सुरवसे,भांडारपाल बाजीराव राउत,महेश सौलाखे व चतुर्थ श्रेणी कर्मचारी पप्पु मडके,रवींद्र जेटिथोर,फर्जना शेख, सिद्धेश्वर मडके, समाधान सुरवसे यांनी परिश्रम घेतले. यावेळी संस्थेचे सर्व प्रशिक्षणार्थी,पालक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे